AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमिर खान आणि गौरी स्प्रॅट अडकले विवाहबंधनात; सोहळ्याचा Video आला समोर

आमिर खान आणि गौरी स्प्रॅट हे विवाहबंधनात अडकले आहेत. नुकताच त्यांचा हा विवाहसोहळा पार पडला असून या सोहळ्याला अंबानी कुटुंबासह अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

आमिर खान आणि गौरी स्प्रॅट अडकले विवाहबंधनात; सोहळ्याचा Video आला समोर
| Updated on: Jul 05, 2026 | 1:39 PM
Share

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि गौरी स्प्रॅट अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. दोघांनी 5 जुलै रोजी मुंबईतील पाली हिल येथील आमिर खान यांच्या निवासस्थानी अत्यंत साध्या आणि कौटुंबिक वातावरणात विवाह केला. या विवाहाची नोंद स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत करण्यात आली. या सोहळ्याला केवळ कुटुंबीय आणि अत्यंत जवळचे मित्र उपस्थित होते.

आमिर खानने काही दिवसांपूर्वीच आपल्या विवाहाविषयी माहिती देताना, मोठा समारंभ न करता घरच्या घरीच नोंदणीकृत विवाह करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. त्यानुसार पाली हिल येथील त्यांच्या निवासस्थानाची आकर्षक रोषणाई करण्यात आली होती आणि विवाहासाठी आवश्यक तयारीही पूर्ण करण्यात आली होती.

कुटुंबीयांची उपस्थिती

या खास प्रसंगी आमिर खानची मुलगी आयरा खान तिच्या पतीसह उपस्थित होती. तसेच मुलगा जुनैद खानदेखील वडिलांच्या या आनंदाच्या क्षणाचा साक्षीदार बनला. याशिवाय आमिर खानच्या बहिणीसह इतर जवळचे नातेवाईकही विवाह सोहळ्यात सहभागी झाले.

100 ते 150 मान्यवरांची उपस्थिती

विवाह सोहळ्यासाठी सुमारे 100 ते 150 निवडक पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले होते. समारंभ अतिशय मर्यादित स्वरूपाचा असला तरी अनेक नामवंत व्यक्तींनी उपस्थित राहून नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या.

अशातच मुंबईत मुसळधार पाऊस आणि रेड अलर्टची परिस्थिती असतानाही विवाहाच्या तयारीत कोणताही अडथळा आला नाही. विवाहाच्या आदल्या दिवशी घराबाहेर फर्निचर आणि खुर्च्या आणणाऱ्या कर्मचाऱ्यांचे फोटोही समोर आले होते. खराब हवामान असूनही सर्व व्यवस्था सुरळीतपणे करण्यात आली.

View this post on Instagram

A post shared by Spice (@spicesocial)

आमिर खानचा तिसरा विवाह

गौरी स्प्रॅट यांच्याशी झालेला हा आमिर खानचा तिसरा विवाह आहे. यापूर्वी त्याने 1986 मध्ये रीना दत्ता यांच्याशी विवाह केला होता. या दाम्पत्याला जुनैद आणि आयरा ही दोन मुले आहेत. मात्र सुमारे 16 वर्षांच्या संसारानंतर 2002 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

त्यानंतर लगान चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आमिर यांची ओळख किरण राव यांच्याशी झाली. दोघांनी 2005 मध्ये विवाह केला आणि त्यांना आझाद हा मुलगा झाला. मात्र 2021 मध्ये आमिर आणि किरण यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

विशेष म्हणजे, घटस्फोटानंतरही आमिर खानचे रीना दत्ता आणि किरण राव या दोन्ही माजी पत्नींसोबत मैत्रीपूर्ण आणि आदरयुक्त संबंध कायम आहेत. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ते एकत्र दिसतात.

Follow Us
मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं...
Thane | मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं वातावरण
पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
Mumbai | पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
जिल्हा बँकेंच्या निवडणुकीत मोठं घडतंय! महायतीतून अर्ज भरणाऱ्या दानवेंच
जिल्हा बँकेंच्या निवडणुकीत मोठं घडतंय! महायतीतून अर्ज भरणाऱ्या अंबादास दानवेंचा विजय की पराभव?
मोठा पूर! 33 हजार 408 क्युसेकने विसर्ग सुरू, महाराष्ट्रातील पवित्र नदी
मोठा पूर! 33 हजार 408 क्युसेकने विसर्ग सुरू, महाराष्ट्रातील पवित्र नदीचा धडकी भरवणारा Video
मविआ'तील गळती काही थांबेना! पद, 20 कोटी अन्... बड्या नेत्याच्या दाव्या
मविआ'तील गळती काही थांबेना! पद, 20 कोटी अन्... बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ
अखेर शिंदेंनी दिलेला शब्द पाळला! प्रकृती ठिक नसतानाही थेट काश्मीरमध्ये
अखेर शिंदेंनी दिलेला शब्द पाळला! प्रकृती ठिक नसतानाही थेट काश्मीरमध्ये पोहोचवली मदत
सचिन अहिर यांनी पक्ष प्रवेश करताच मुलीची प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरे
सचिन अहिर यांनी पक्ष प्रवेश करताच मुलीची प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरेंवर... नेमकं काय म्हणाली?
राज्यात पावसाचा हाहाकार! विज पुरवठाही खंडीत, तब्बल 4 शहरांना...
राज्यात पावसाचा हाहाकार! विज पुरवठाही खंडीत, तब्बल 4 शहरांना...
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?