विक्रोळीत बेस्टचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटून बस दुभाजकावर आदळली; 15 प्रवासी जखमी

बेस्टची 27 क्रमांकाची बस भांडुपवरून वरळीला जात असताना हा प्रकार घडला.

विक्रोळीत बेस्टचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटून बस दुभाजकावर आदळली; 15 प्रवासी जखमी
Follow us
| Updated on: Oct 17, 2020 | 3:06 PM

मुंबई: पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळीनजीक शनिवारी बेस्टच्या बसला अपघात झाला. यामध्ये बसमधील 15 प्रवाशी जखमी झाले असून यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते. जखमींवर सध्या राजावाडी आणि विक्रोळीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Bus met with an accident at Eastern Express Highway near Vikhroli Mumbai)

प्राथमिक माहितीनुसार, बेस्टची 27 क्रमांकाची बस भांडुपवरून वरळीला जात असताना हा प्रकार घडला. यावेळी बसमध्ये 20 ते 25 प्रवासी होते. पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळी येथे एक बाईकस्वार बसच्या समोर आला. या बाईकस्वाराला वाचवण्याच्या नादात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात चालक आणि बसमधील 15 प्रवासी जखमी झाले. ही धडक इतकी जोरात होती की, बसची एक बाजू पूर्णपणे चेपली गेली आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा ताबा घेत अपघाताच्या चौकशीला सुरुवात केली. बसमधील 16 प्रवाशांना किरकोळ स्वरुपात इजा झाली असून सात प्रवासी राजावाडी रुग्णालय, घाटकोपर येथे उपचार घेत असून आठ प्रवासी आंबेडकर रुग्णालय, विक्रोळी येथे तर एका प्रवाशावर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कोरोनामुळे सध्या मुंबईतील लोकल ट्रेनची सेवा सामान्य लोकांसाठी बंद आहे. केवळ डॉक्टर्स, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि काही शासकीय कर्मचाऱ्यांनाच ट्रेनने प्रवास करण्याची मुभा आहे. त्यामुळे वाहतुकीचा सर्व भार बेस्ट सेवेवर आला आहे. या पार्श्वभूमीवर ‘बेस्ट’कडून सर्व मार्गांवर दररोज जादा बसेस सोडल्या जात आहेत. तर दुसरीकडे वाहतुकीचा सर्व ताण रस्ते वाहतुकीवर आल्याने प्रचंड वाहतूक कोंडीही होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांकडून रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे.

इतर बातम्या:

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू, पहिल्या टप्प्यात मुंबईत 1 कोटी व्यक्तींचे सर्वेक्षण

मुंबईतील सायन ब्रीज दुरुस्तीच्या कामासाठी 3 दिवस बंद, 72 तासांनी खुला होणार

…म्हणून तूर्तास महिलांना लोकलनं प्रवास करता येणार नाही

(Bus met with an accident at Eastern Express Highway near Vikhroli Mumbai)

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.