AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विक्रोळीत बेस्टचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटून बस दुभाजकावर आदळली; 15 प्रवासी जखमी

बेस्टची 27 क्रमांकाची बस भांडुपवरून वरळीला जात असताना हा प्रकार घडला.

विक्रोळीत बेस्टचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटून बस दुभाजकावर आदळली; 15 प्रवासी जखमी
| Updated on: Oct 17, 2020 | 3:06 PM
Share

मुंबई: पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळीनजीक शनिवारी बेस्टच्या बसला अपघात झाला. यामध्ये बसमधील 15 प्रवाशी जखमी झाले असून यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते. जखमींवर सध्या राजावाडी आणि विक्रोळीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Bus met with an accident at Eastern Express Highway near Vikhroli Mumbai)

प्राथमिक माहितीनुसार, बेस्टची 27 क्रमांकाची बस भांडुपवरून वरळीला जात असताना हा प्रकार घडला. यावेळी बसमध्ये 20 ते 25 प्रवासी होते. पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळी येथे एक बाईकस्वार बसच्या समोर आला. या बाईकस्वाराला वाचवण्याच्या नादात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात चालक आणि बसमधील 15 प्रवासी जखमी झाले. ही धडक इतकी जोरात होती की, बसची एक बाजू पूर्णपणे चेपली गेली आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा ताबा घेत अपघाताच्या चौकशीला सुरुवात केली. बसमधील 16 प्रवाशांना किरकोळ स्वरुपात इजा झाली असून सात प्रवासी राजावाडी रुग्णालय, घाटकोपर येथे उपचार घेत असून आठ प्रवासी आंबेडकर रुग्णालय, विक्रोळी येथे तर एका प्रवाशावर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कोरोनामुळे सध्या मुंबईतील लोकल ट्रेनची सेवा सामान्य लोकांसाठी बंद आहे. केवळ डॉक्टर्स, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि काही शासकीय कर्मचाऱ्यांनाच ट्रेनने प्रवास करण्याची मुभा आहे. त्यामुळे वाहतुकीचा सर्व भार बेस्ट सेवेवर आला आहे. या पार्श्वभूमीवर ‘बेस्ट’कडून सर्व मार्गांवर दररोज जादा बसेस सोडल्या जात आहेत. तर दुसरीकडे वाहतुकीचा सर्व ताण रस्ते वाहतुकीवर आल्याने प्रचंड वाहतूक कोंडीही होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांकडून रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे.

इतर बातम्या:

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू, पहिल्या टप्प्यात मुंबईत 1 कोटी व्यक्तींचे सर्वेक्षण

मुंबईतील सायन ब्रीज दुरुस्तीच्या कामासाठी 3 दिवस बंद, 72 तासांनी खुला होणार

…म्हणून तूर्तास महिलांना लोकलनं प्रवास करता येणार नाही

(Bus met with an accident at Eastern Express Highway near Vikhroli Mumbai)

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.