महामार्गांवरील अपघातग्रस्तांचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांची ‘हायवे मृत्यूंजय योजना’!

महामार्गांवर होणाऱ्या अपघातातील जखमींचा जीव वाचवण्यासाठी आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.

महामार्गांवरील अपघातग्रस्तांचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांची 'हायवे मृत्यूंजय योजना'!
या अपघातग्रस्त दोन कारमधील कुटुंबीय एकत्र पुण्याला एका कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रमावरुन परतताना हा अपघात झाला. तर अन्य दोन कार सोबत होत्या. परंतु, घाटात मुबंईकडे जाताना दोन कार पुढे निघुन गेल्या आणि या दोन कारचा अपघात झाला.
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 5:27 PM

मुंबई : राज्यातील विविध महामार्गांवर वाहनचालक शिस्त पाळत नाहीत. त्यामुळे अनेक अपघात होतात. अनेकांचा जीव जातो. मात्र आता महामार्गांवर होणाऱ्या अपघातातील जखमींचा जीव वाचवण्यासाठी आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य वाहतूक पोलिसांकडून संपूर्ण राज्यात हायवे मृत्यूंजय योजना राबवली जाणार आहे. तशी घोषणा राज्य वाहतूक पोलिसांकडून करण्यात आली आहे.(Maharashtra Police to provide immediate relief to the injured in road accidents)

कशी आहे हायवे मृत्यूंजय योजना ?

>> महामार्गांवर होणाऱ्या अपघातातील जखमींना तात्काळ मदत मिळावी यासाठी महामार्ग परिसरातील ठराविक स्थानिकांना मृत्यूंजय देवदूत हे नाव देण्यात येणार आहे.

>> ज्या स्थानिकांना मृत्युंजय देवदूत हे नाव दिले जाईल ते सरकारी व्यवस्थेशी जोडले जातील आणि अपघातग्रस्तांना मदत मिळवून देण्यात त्यांची महत्वाची भूमिका असेल.

>> मृत्युंजय देवदूतांना अपघातग्रस्तांच्या तात्काळ मदतीसाठी लागणारे स्ट्रेचर, फर्स्ट एड बॉक्स आणि इतर साहित्यही दिले जाणार.

>> आरोग्य विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची माहिती मृत्युंजय देवदूत अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवणार.

>> महामार्ग सुरक्षा पथकाकडून मृत्युंजय देवदूतांना ओळळपत्रही देण्यात येणार. त्याचबरोबर चांगले काम करणाऱ्यांचा देवदूतांचा राज्य सरकारच्या रस्ते सुरक्षा विभागाकडून सन्मानही केला जाणार

रस्ते अपघातात हजारो मृत्यूमुखी

2020चा विचार केला तर महाराष्ट्रात विविध ठिकाणी रस्ते अपघातात तब्बल 11 हजार 452 जणांचा मृत्यू झाला आहे. तशी माहिती रस्ते वाहतूकमंत्री अनिल परब यांनी 18 जानेवारी 2021 रोजी दिली आहे. 2020 मध्ये महाराष्ट्रात एकूण 25 हजार 456 अपघातांची नोंद झाली. त्यात 11 हजार 452 जणांनी आपले प्राण गमावले. ही आकडेवारी अत्यंत चिंताजनक असल्याचं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी व्यक्त केलं होतं. जानेवारीमध्ये रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी वाहन चालकांना ‘यमाला रोखण्यासाठी संयम बाळगा आणि नियम पाळा’ असं आवाहन केलं होतं. दरम्यान, 2020 मध्ये कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघातांची संख्या कमी झाली होती.

2019 ची आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्रात एकूण 32 हजार 295 अपघातांची नोंद झाली होती. त्यात 12 हजार 788 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे रस्ते अपघातातील मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी आणि अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यासाठी रस्ते वाहतूक पोलिसांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यात सामान्य नागरिकांना सहभागी करुन घेण्यात येणार असल्यामुळे या उपक्रमाकडे राज्याचं लक्ष लागलं असेल.

संबंधित बातम्या :

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, आई-वडील-बहिणीचा मृत्यू, चिमुकला बचावला

जळगाव ट्रक अपघातात एकाच कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू, आभोळा गावावर शोककळा

Maharashtra Police to provide immediate relief to the injured in road accidents

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.