AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील उद्योग चक्र फिरले, 13 लाख 86 हजार कामगार पुन्हा कामावर रुजू : सुभाष देसाई

एप्रिल महिन्यापासून 55 हाजर 245 उद्योगांनी उत्पादन सुरु केलं आहे. तर 13 लाख 86 हजार कामगार पुन्हा कामावर रुजू झाले आहेत

राज्यातील उद्योग चक्र फिरले, 13 लाख 86 हजार कामगार पुन्हा कामावर रुजू : सुभाष देसाई
| Updated on: Jun 05, 2020 | 4:16 PM
Share

मुंबई : कोरानामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात (Subhash Desai On Mission Began Again) करण्यासाठी उद्योग विभाग सज्ज झालं आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. ‘मिशन बिगेन अगेन’च्या मिशनमध्ये उद्योग विभागही सज्ज झालं आहे. एप्रिल महिन्यापासून 55 हाजर 245 उद्योगांनी उत्पादन सुरु केलं आहे. तर 13 लाख 86 हजार कामगार पुन्हा कामावर रुजू झाले आहेत, असं सुभाष देसाई (Subhash Desai On Mission Began Again) यांनी सांगितलं.

मुंबई आणि जवळपासच्या महापालिका, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, मालेगाव इथे अत्यावश्यक सेवेतील उद्योगांना सरकारने परवानगी दिली आहे. निर्यात करणार्‍या उद्योगांनाही परवानगी दिली आहे. शेती आधारित उद्योगांनाही परवानगी दिली आहे. संरक्षण दलाला लागणार्‍या उत्पादनांच्या उद्योगांना परवानगी दिली, असंही सुभाष देसाई म्हणाले.

तसेच, उद्योग चक्र वेगाने फिरु लागले आहेत. उद्योग विभाग आणि एमआयडीसी उद्योगवाढीसाठी प्रयत्नशील आहे. देशातील विदेशी गुंतवणुकींपैकी 33 टक्के गुंतवणूक राज्यात येते. या गुंतवणुकदारांसाठी आणखी चांगले वातावरण तयार करण्याचं काम सुरु आहे.

रायगडमध्ये दिघी येथे 15 हजार एकरावर नवी एमआयडीसी उभी राहत आहे. माणगाव एमआयडीसी असं या एमआयडीसीचं नाव असेल. कारण ती माणगाव तालुक्यात आहे (Subhash Desai On Mission Began Again). देशी आणि विदेशी 10 गुंतवणूकदारांशी आमची बोलणी सुरु आहे, त्यांना इथे उद्योग सुरु करण्यासाठी जागा दिली जाईल, अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली.

माणगावपासून मुंबई जवळ आहे, नवी मुंबई विमानतळ जवळ आहे, जेएनपीटी बंदर जवळ आहे. 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक इथे होऊ शकते. माणगाव एमआयडीसीत हजारो नोकर्‍या उपलब्ध होतील. यात इंजिनिअरिंग, औषध उत्पादक, इलेक्ट्रॉनिक असे विविध उद्योग इथे उभे राहतील.

मजूर आपापल्या राज्यात परतले आहेत, स्थानिकांना नोकर्‍या मिळाव्या म्हणून आम्ही एक पोर्टल सुरु करणार आहोत. ‘महाराष्ट्र एम्प्लॉयमेंट ब्यूरो’, असं या पोर्टलचं नाव असेल. या पोर्टलवर नोंदणी केलेल्या तरुणांना उद्योगांना लागणारे मनुष्यबळ पुरवले जाईल. जिथे कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव नाही, अशा ठिकाणी या महिन्यातच आणखी काही उद्योग सुरु करण्याचा प्रयत्न आहे, असं ही सुभाष देसाई यांनी (Subhash Desai On Mission Began Again) सांगितलं.

संबंधित बातम्या :

रायगडकरांना दिलासा देण्यासाठी आलो आहे, तातडीने 100 कोटी जाहीर : उद्धव ठाकरे

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व परीक्षा घेण्यास राज्यपालांची मंजुरी

मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.