AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मालेगाव खटल्याच्या निकालापूर्वी साध्वी प्रज्ञा सिंह यांची एका वाक्यात प्रतिक्रिया…निकालाबाबत कोर्टात काय घडले?

मालेगाव शहरात २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोटाच्या खटला एनआयए कोर्टाचे न्यायाधीश एल. के. लाहोटी यांच्यासमोर सुरु आहे. या खटल्यात सरकारी वकिलांनी ३२३ साक्षीदारांचे साक्षीपुरावे नोंदवले आहे. त्यापैकी ३४ साक्षीदार फितूर झाले आहेत.

मालेगाव खटल्याच्या निकालापूर्वी साध्वी प्रज्ञा सिंह यांची एका वाक्यात प्रतिक्रिया...निकालाबाबत कोर्टात काय घडले?
Sadhvi Pragya
| Updated on: May 08, 2025 | 1:02 PM
Share

मालेगावमध्ये २००८ साली झालेल्या स्फोटाच्या खटल्याचा निकाल तब्बल १७ वर्षांनी गुरूवारी ८ मे रोजी जाहीर होणार होता. यापूर्वी, १९ एप्रिल रोजी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. परंतु आजही निकाल देण्यात आला नाही. निकालासाठी पुढील तारीख दिली गेली आहे. या निकालाबाबत बॉम्बस्फोट खटाल्यातील आरोपी स्वाध्वी प्रज्ञा यांनी एका ओळीत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपला ‘सत्यमेव जयते’वर पूर्ण विश्वास आहे, असे म्हटले आहे.

मालेगावातील एका धार्मिक स्थळाबाहेर २००८ मध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात ६ लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच १०१ जण जखमी झाले होते. या स्फोटाच्या खटल्याचा निकाल तब्बल १७ वर्षांनी गुरूवारी येणार होता. १ लाखापेक्षा जास्त पाने असल्याने अभ्यास करायला वेळ लागणार आहे. त्यामुळे या खटल्याचा निकालासाठी आता ३१ जुलैची पुढील तारीख देण्यात आली आहे. आतापर्यंत कोर्टात या प्रकरणात आरोपी साध्वी प्रज्ञा, समीर कुलकर्णी, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर दिव्वेदी यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले आहे.

निकालाच्या पूर्वी साध्वी प्रज्ञा यांनी सांगितले की, कोणावर अन्याय होणार नाही, अशी मला अशा आहे. माझा सत्यमेव जयतेवर पूर्ण विश्वास आहे. देशात देशभक्त राहिला पाहिजे, गद्दार नाही. पूजा करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र, त्यात अडथळा आणणे हक्क नाही. काँग्रेसने शहीद जवानांचा नेहमी अपमान केला. मात्र, भाजपने शहीद जवानांना सन्मान दिला आहे. नवीन भारत नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह यांचा आहे. या भारतामध्ये आम्ही कोणाला छेडत नाही आणि आम्हाला छेडल तर त्याला सोडत नाही.

मालेगाव खटल्याची पार्श्वभूमी अशी

मालेगाव शहरात २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोटाच्या खटला एनआयए कोर्टाचे न्यायाधीश एल. के. लाहोटी यांच्यासमोर सुरु आहे. या खटल्यात सरकारी वकिलांनी ३२३ साक्षीदारांचे साक्षीपुरावे नोंदवले आहे. त्यापैकी ३४ साक्षीदार फितूर झाले आहेत. या खटल्यात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी उर्फ स्वामी अमृतानंद, सुधाकर चुतर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांच्याविरोधात हत्येशी संबंधित दहशतवाद विरोधी कायदा आणि युएपीए अंतर्गत खटला चालला. या खटल्यात श्याम साहु, प्रवीण टकल्की, रामजी कालसंग्रा आणि संदीप डांगे हे आरोपी फरार घोषित करण्यात आले.

Follow Us
पायधुनीमधील चौघांच्या मृत्यूचा ससपेन्स कायम, कलिंगड की गोल्डन अवर....
पायधुनीमधील चौघांच्या मृत्यूचा ससपेन्स कायम, कलिंगड की गोल्डन अवर.....
'TMC चा पराभव नाहीच', उद्धव ठाकरेंचा ममता बॅनर्जींना कॉल, राऊतांनी...
'TMC चा पराभव नाहीच', उद्धव ठाकरेंचा ममता बॅनर्जींना कॉल, राऊतांनी....
सावधान...महाराष्ट्रात बोगस नवरीचा धुमाकूळ, आठ तरुणांशी लग्न करून ठकवलं
सावधान...महाराष्ट्रात बोगस नवरीचा धुमाकूळ, आठ तरुणांशी लग्न करून ठकवलं.
नसरापूर प्रकरणावर राज्यभर संताप; पोस्टमॉर्टेम अहवालातील धक्कादायक.....
नसरापूर प्रकरणावर राज्यभर संताप; पोस्टमॉर्टेम अहवालातील धक्कादायक......
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार.
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी.
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.