AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्यांचा पेगही 1500 रुपयांचा, संजय राऊत यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Sanjay Raut on CM Eknath Shinde Government : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून सरकारला घेरलं आहे. तसंच लाडकी बहीण योजनेवरही त्यांनी भाष्य केलं आहे. संजय राऊत काय म्हणाले? वाचा सविस्तर...

त्यांचा पेगही 1500 रुपयांचा, संजय राऊत यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
संजय राऊत
| Updated on: Sep 05, 2024 | 10:48 AM
Share

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. या योजनेवर विरोधक टीका करत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवर बोलताना शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.  राज्यातील हे सरकार १५००च्यावर जाणार नाही. स्वत १५ हजार कोटी ठेवतील. पण बहिणींना १५००, कर्मचाऱ्यांना १५०० देतील. त्यांचं १५०० चं लिमिट आहे. त्यांचा एक पेग १५०० चा आहे. त्याच्यावर ते जाणार नाही. आमच्याकडून कुणी कोर्टात गेलं नाही. कोर्ट त्यांच्या बाजूने आहे. ते कोर्टालाही १५०० पाठवतील, असं संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा

गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत. ते मुख्यमंत्री आहेत. गडचिरोलीचा कायापालट करणार असं सांगत होते. आदिवासी आणि गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट करण्यापैक्षा या ठिकाणी खाण उद्योग आहे. त्याचा आर्थिक व्यवहार आपल्याला हातात राहावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी जिल्हा जवळ ठेवला आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी नेमले आहेत. आदिवासींचा विकास नाहीये. आदिवासींना मृतदेह खांद्यावर घेऊन जावं लागत आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यनमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

शिवरायांचा पुतळा कोसळला, राऊतांनी सरकारला घेरलं

हे सरकार महाराजांच्या नावाने भ्रष्टाचार करत आहे. महाराजांचा महाराष्ट्र लुटला जात आहे. गुजरातचे ठेकेदार महाराष्ट्र लुटत आहेत. काल आम्ही दुष्काळी भागात होतो. परभणी, हिंगोली, संभाजीनगर येथील रस्ते वाहून गेले. तिकडचे जे तरुण कार्यकर्ते आहेत, ज्यांची घरे शाळा गुरंढोरं वाहून गेली. त्यांनी कागदपत्रे आमच्यासमोर ठेवली. या ग्रामीण भागातील रस्त्याची कामे गुजरातच्या ठेकेदारांना दिली आहेत. महाराष्ट्रात तरुण नाहीत का. आम्ही काल फिरत होतो. दुष्काळाची अवस्था गंभीर आहे. सर्व वाहून गेलं आहे. सरकारने पंचनामा केला नाही. गुजरातच्या ठेकेदारांनी केलेले रस्ते वाहून गेले आहेत, असंही संजय राऊत म्हणालेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आमच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले. मग फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करणार का? मी नवाब मलिक आणि अनिल देशमुखांवर खोटे गुन्हे दाखल केले. मग गृहखात्याला दोषी धरणार का?, असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केलाय.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.