AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक टार्गेटवर?; आनंद परांजपे यांचा सरकारवर नेमका आरोप काय?

राज्य सरकारकडून दडपशाहीचा वापर केला जातो. कधीकधी पैशांचं प्रलोभन दाखविलं जातं. यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना टार्गेट केल्याचं काम केलं जात असल्याचा आरोपही आनंद परांजपे यांना केला.

ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक टार्गेटवर?; आनंद परांजपे यांचा सरकारवर नेमका आरोप काय?
आनंद परांजपे
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Feb 01, 2023 | 10:11 PM
Share

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar ) यांनी ठाण्यातील नगरसेवकांची बैठक घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या दालनात ही बैठक घेण्यात आली. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, माजी खासदार आनंद परांजपे हे उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना आनंद परांजपे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसशी एकनिष्ठ असल्याच्या भावना ठाण्यातील नगरसेवकांनी व्यक्त केल्या. आम्ही शरद पवार यांच्या विचारांवर पक्के असल्याचं सांगितलं. पण,गेल्या दोन-तीन महिन्यापासून पोलीस आणि प्रशासनाचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप आनंद परांजपे (Anand Paranjape) यांनी केला.

राज्य सरकारकडून दडपशाहीचा वापर केला जातो. कधीकधी पैशांचं प्रलोभन दाखविलं जातं. यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना टार्गेट केल्याचं काम केलं जात असल्याचा आरोपही आनंद परांजपे यांना केला.

हे घटनाबाह्य सरकार करू शकते

ऐन निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात एखादा खोटा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. जितेंद्र आव्हाड यांनी निवडणुकीच्या काळात जेलमध्ये टाकण्याचं काम हे घटनाबाह्य सरकार करू शकते, अशी भीती नगरसेवकांनी व्यक्त केल्याचं आनंद परांजपे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता खंबीर आहेत. नगरसेवकांनी आपल्या मनातील शंका अजित पवार यांच्यासमोर आज मांडल्या. ९ मार्च २०२२ ला नगरपालिकेची मुदत संपली. याला सुमारे एक वर्ष होत आलंय.

मागच्या वेळचा निधी कापण्यात आला. प्रशासक बसल्यानंतर घटनाबाह्य सरकारबरोबर असाल तर निधी दिला जातो. ही व्यथाही नगरसेवकांनी व्यक्त केल्याचं आनंद परांजपे यांनी सांगितलं.

जितेंद्र आव्हाड यांना अटक होणार?

मला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मला जेलमध्ये टाकण्याचा प्लॅन तयार करण्यात आल्याचा दावाही जितेंद्र आव्हाड यांनी केला.

Follow Us
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत
महायुतीसमोरचं सर्वात मोठं संकट टळलं; गोकुळ गीते यांचं बंड अखेर थंडावलं
मोठी ब्रेकिंग! महायुतीसमोरचं सर्वात मोठं संकट टळलं; गोकुळ गीते यांचं बंड अखेर थंडावलं