AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या मार्गामुळे बोरीवली ते ठाणे अंतर पंधरा मिनिटांत पार होणार

ठाण्याच्या घोडबंदर येथे होणारी वाहतूक कोंडीतून सूटका करण्यासाठी एमएमआरडीने बोरीवली ते ठाणे या भूयारी मार्गिकेची योजना आखली होती. या प्रकल्पाच्या टेंडरला एमएमआरडीएने गेल्याच आठवड्यात मंजूरी दिली आहे.

या मार्गामुळे बोरीवली ते ठाणे अंतर पंधरा मिनिटांत पार होणार
TWINTUNNELImage Credit source: TWINTUNNEL
| Updated on: Jan 18, 2023 | 7:55 AM
Share

मुंबई : ठाणे ते बोरीवली हे दीड तासांचे अंतर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत पार करता येणाऱ्या एका प्रकल्पाला चालना मिळाली आहे. त्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अकरा किमीचे दोन बोगदे खणण्यात येणार आहेत. त्यासाठी सरकारने सहा पदरी मल्टीमोडल हायवे बांधणार आहे. या योजनेचाच एक भाग म्हणून ठाण्याच्या टीकुजीनिवाडी ते बोरीवलीतील पश्चिम एक्सप्रेस हायवेला जोडणारा संजय गांधी उद्यानाच्या खालून जाणारा भूयारी मार्ग बांधला जाणार आहे. त्यासाठी 11000 हजार कोटींचे टेंडर गेल्याच आठवड्यात काढले आहे. या भूयारी मार्गिकांचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी होणार आहे.

बोरीवलीच्या संजय गांधी उद्यानाखालून सहा पदरी महामार्गासाठी  11 किलोमीटरचे दोन टनेल खणण्यात येणार आहेत. त्यासाठी गेल्या आठवड्यात एमएमआरडीएने 11 हजार कोटीचे टेंडर काढले आहे. आम्ही संजय गांधी उद्यानातील या दोन भूयारी मार्गांसाठी आरेखन आणि बांधकाम यासाठी टनेल तसेच अॅप्रोच रोडच्या सिव्हील कामासाठी टेंडर काढले आहे. हा मार्ग 11.8 किमीचा असून तो ठाण्याच्या टीकूजीनिवाडी येथून सुरू होऊन बोरीवली वेर्स्टन एक्सप्रेस हायवेजवळ संपणार आहे. यात 10.25  किमीचे डबल लेन टनेल आणि 1.55 किमीचा जंक्शन असणार आहेत. तसेच हे दोन्ही टनेल 3 + 3 लेनचे असतील असे एका अधिकाऱ्याने स्पष्ठ केले.
एमएसआरडीसीने  मांडला होता मूळ प्रस्ताव
दोन पॅकेजमध्ये हे काम विभागून केले जाणार आहे. या प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल आणि विस्तृत अहवाल मंजूर झाला असून वनविभागाकडे तो पाठवण्यात आला होता. त्यात त्यांनी काही बदल सुचवले होते. हे बोगदे खणण्यासाठी टनेल बोअरींग मशिनचा वापर होणार असून संजय गांधी उद्यानातील जैवविविधता पाहता अंत्यत काळजीपूर्वक हे काम केले जाणार आहे. ठाणे येथील घोडबंदर रोडवर होणाऱ्या वाहतूक वर्दळीतून सूटका करण्यासाठी 2015 मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या प्रकल्पाचा प्रस्ताव मांडला होता.

Follow Us
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून
मोठी बातमी! कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून कोर्टात याचिका दाखल
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ