AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांसह ठाणेकर घेणार ‘शून्य सावली’चा अनुभव

मुंबई : आपली सावली कधीही आपली साथ सोडत नाही, असं म्हटलं जाते. पण उद्या मुंबईकरांची सावली अदृश्य होणार आहे, असं खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. मुंबईकरांना गुरुवार दि. 16 मे रोजी दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी, तर ठाणेकरांना 17 मे रोजी 12 वाजून 35 मिनिटांनी आपली सावली अदृश्य झाल्याचा अनुभव घेता येणार आहे. […]

मुंबईकरांसह ठाणेकर घेणार 'शून्य सावली'चा अनुभव
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM
Share

मुंबई : आपली सावली कधीही आपली साथ सोडत नाही, असं म्हटलं जाते. पण उद्या मुंबईकरांची सावली अदृश्य होणार आहे, असं खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. मुंबईकरांना गुरुवार दि. 16 मे रोजी दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी, तर ठाणेकरांना 17 मे रोजी 12 वाजून 35 मिनिटांनी आपली सावली अदृश्य झाल्याचा अनुभव घेता येणार आहे.

“उत्तर गोलार्धातील कर्कवृत्त आणि दक्षिण गोलार्धातील मकरवृत्त यामधील प्रदेशातच सूर्य आकाशात बरोबर डोक्यावर आल्याने माणसाची सावली अदृश्य होते. शून्य सावलीचा अनुभव आपल्या वर्षातून दोनवेळा घेता येतो”, असं सोमण म्हणाले.

आपण जिथे असतो त्या स्थळाचे अक्षांश आणि सूर्याची क्रांती ज्या दिवशी सारखी होते त्याच दिवशी दुपारी मध्यान्हाला सूर्य आकाशात ठीक डोक्यावर येतो. मुंबईचे अक्षांश उत्तर 19 अंश आहे. गुरुवार दि. 16 मे रोजी सूर्याची क्रांती उत्तर 19 अंश होणार असल्याने दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी सूर्य आकाशात ठीक डोक्यावर येईल आणि मुंबईकरांना शून्य सावलीचा अनुभव घेता येईल.

“रविवारी 28 जुलै रोजी पुन्हा सूर्याची क्रांती उत्तर 19 अंश होणार आहे. परंतु तो दिवस पावसाळ्याचा असल्याने शून्य सावलीचा अनुभव आपणास घेता येणार नाही. ठाणे, बोरिवली, डोंबिवली, कल्याणकरांना शुक्रवार 17 मे रोजी दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी  शून्य सावली अनुभवता येईल”, असेही खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी म्हणाले.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.