AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : दानवेंची कबुली, ठाकरे सोडून गेल्याने भाजपचं नुकसान, पाहा Video

उद्धव ठाकरे महायुतीला सोडून गेल्यानं भाजपचं नुकसान झालं, अशी कबुली दानवेंनी दिली. मात्र अचानक दानवे असं का बोलले, यामागे नेमकं काय टायमिंग अशी चर्चा सुरु झाली. वाचा टीव्ही९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : दानवेंची कबुली, ठाकरे सोडून गेल्याने भाजपचं नुकसान, पाहा Video
| Updated on: Sep 03, 2024 | 9:16 PM
Share

भाजपचे नेते रावसाहेब दानवेंचं हे वक्तव्य फार मोठं आहे. अजित पवारांच्या येण्यामुळं भाजपचं नुकसान झालं नाही..तर उद्धव ठाकरे धोका देवून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेल्यानं आमचं नुकसान झालं, असं बेधडकपणे रावसाहेब म्हणालेत. TV9शी बोलताना, दानवेंनी ठाकरेंबद्दल धोका शब्द वापरला. तर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतही दानवेंनी उद्धव ठाकरेंमुळंच भाजपचं नुकसान झाल्याचं म्हटलं. लोकसभा निवडणुकीत अजित पवार आमच्यासोबत येण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्या जाण्याचा आम्हाला खूप फटका बसला. महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर महाराष्ट्रात थेट लोकसभेचीच सार्वत्रिक निवडणूक झाली. ज्यात महाराष्ट्रानं महाविकास आघाडीलाच पसंती दिली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा अधिक फायदा झाला.

महाराष्ट्रातील 48 जागांपैकी महाविकास आघाडीला 30 आणि सांगलीत मूळ काँग्रेसचेच पण अपक्ष लढलेले विशाल पाटील विजयी झाले आता ते काँग्रेससोबतच आहेत. म्हणजेच मविआचा आकडा 31वर गेलाय तर महायुती अवघ्या 17 जागांवर आटोपली. रावसाहेब दानवे फक्त भाजपचेच नेते नाहीत..तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं त्यांना, निवडणूक संचालन समितीचं प्रदेश संयोजक केलंय. म्हणजे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या बरोबरीचं पद दानवेंना दिलंय. अशा वेळी, उद्धव ठाकरेंमुळं भाजपचं नुकसान असं बोलणं म्हणजे, महाविकास आघाडीला आयतीचं संधी देणं आहे.

पाहा व्हिडीओ:-

लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा फटका, जालन्यात स्वत: रावसाहेब दानवेंनाही बसला. काँग्रेसच्या कल्याण काळेंनी भाजपच्या दानवेंना 1 लाखांहून अधिक मतांनी पराभूत केलं. आता, विधानसभेतही जरांगे फॅक्टरचा परिणाम दिसेल का?, या प्रश्नावर दानवेंचं काय म्हणणंय तेही ऐका. विधानसभेच्या निवडणुका 2 अडीच महिन्यांवर आल्यात. सध्या जागा वाटपावरुन महायुती आणि महाविकास आघाडीच्या जोर बैठका सुरु आहेत. त्यातच दानवेंनी, ठाकरेंमुळं भाजपचं नुकसान म्हणणं म्हणजे, महाविकास आघाडीला राजकीय मायलेज मिळवून देण्यासारखं आहे.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.