AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

video : टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट : शिंदे- फडणवीस सरकारवर 10 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

 मेट्रोच्या कारशेडवरुन पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध भाजप असा सामना सुरु झालाय. कारण ज्या कांजूरमार्गचा विरोध भाजपनं केला. आता तीच जमीन मेट्रो 6 च्या कारशेडसाठी देण्यात आलीय.

video : टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट : शिंदे- फडणवीस सरकारवर 10 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
| Updated on: Apr 15, 2023 | 11:02 PM
Share

मुंबई : मेट्रोच्या कारशेडवरुन पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध भाजप असा सामना सुरु झालाय. कारण ज्या कांजूरमार्गचा विरोध भाजपनं केला. आता तीच जमीन मेट्रो 6 च्या कारशेडसाठी देण्यात आलीय. त्यावरुन पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना सवाल करत, 10 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केलाय.

मुंबईतल्या मेट्रो 6 च्या कारशेडसाठी, कांजूरमार्गमध्ये 15 हेक्टर जागा देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आणि पुन्हा ठाकरे आणि भाजपचे नेते आमनेसामने आलेत. ही तीच जागा, ज्या जागेवरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये ठाकरे आणि भाजप आमने सामने आली होती. मेट्रो 3च्या कारशेडसाठी, कांजूरमार्गचा प्रस्ताव ठाकरे सरकारनं दिला होता. त्याला भाजपनं विरोध केला होता. मात्र मेट्रो 6 साठी हीच जागा देण्याचा निर्णय झाल्यानंतर, आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल करत 10 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केलाय.

कांजूरमार्गची जागा, मेट्रो 3च्या कारशेडसाठी योग्य नाही, असा अहवालच असल्याचं फडणवीसही सांगत होते. मात्र आता तीच जमीन मेट्रो 6च्या कारशेडसाठी कशी देण्यात आली असा सवालही आदित्य ठाकरेंनी केलाय. स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी या मेट्रो 6 ला मार्ग आता मोकळा होणार आहे.

सुप्रीम कोर्टात कांजूरमार्गच्या जागेच्या मालकीवरुन केस सुरु होती. ती केस दावाकर्त्याकडून केस मागे घेण्यात आलीय. मात्र ही जमीन कोणाची आहे, असा सवालही आदित्य ठाकरेंनी केलाय.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.