AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शाह यांच्या पुत्रमोहाच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर, ‘तुमच्या पुत्र प्रेमामुळे भारत…’

"केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सांगायचं तुमच्या पुत्र प्रेमामुळे भारत अंतिम सामना हरलेला आहे. त्यामुळे मी पुत्र प्रेम दाखवत नाही. त्यांच्या पक्षात दुसरा अध्यक्ष आहे. अमित शाह यांचं पक्षातील नेमकं स्थान काय आहे? त्यांचा अध्यक्ष दुसरा आहे. पण अमित शाह यांना सांगायचंय, तुम्ही या गोष्टी बोलता तेव्हा तुमच्या आणि तुमच्या चेल्याचपाट्यात एक वाक्यता असू द्या", अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

अमित शाह यांच्या पुत्रमोहाच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर, 'तुमच्या पुत्र प्रेमामुळे भारत...'
अमित शाह आणि उद्धव ठाकरे
| Updated on: Apr 15, 2024 | 9:14 PM
Share

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भंडाऱ्यातील प्रचारसभेत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडला नाही. उद्धव ठाकरे यांच्या पुत्रप्रेमाने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुत्रीप्रेमाने राष्ट्रवादी पक्ष फुटला, अशी टीका अमित शाह यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सांगायचं तुमच्या पुत्र प्रेमामुळे भारत अंतिम सामना हरलेला आहे. त्यामुळे मी पुत्र प्रेम दाखवत नाही. त्यांच्या पक्षात दुसरा अध्यक्ष आहे. अमित शाह यांचं पक्षातील नेमकं स्थान काय आहे? त्यांचा अध्यक्ष दुसरा आहे. पण अमित शाह यांना सांगायचंय, तुम्ही या गोष्टी बोलता तेव्हा तुमच्या आणि तुमच्या चेल्याचपाट्यात एक वाक्यता असू द्या. फडणवीस म्हणाले होते. मी पुन्हा येईन. ते दोन पक्ष फोडून पुन्हा आले. त्यामुळे तुमची लाज तुमचे चेले चपाटे काढत आहेत”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

सलमान खानच्या घरावर गोळीबार, ठाकरे काय म्हणाले?

“ज्या पद्धतीने खुलेपणाने गुंडागर्दी सुरू आहे. सरकारला सत्ता चालवण्याचा अधिकार नाही. घटनाबाह्य सरकार सरकार चालवत आहे. गुंड कोणीही गोळीबार करत आहेत. यांच्यात त्यांना रोखण्याची हिंमत नाही. तो कोण आहे आला कसा, गोळीबार करून कसा जात आहे. यांचं लक्ष नाहीये”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

मविआच्या संयुक्त सभा होणार?

“काही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार जाहीर व्हायचे बाकी आहे. दोन दिवसात होतील. आम्ही राज्यासाठी वचननामा वेगळा द्यायचा का यावर विचार करत आहोत. त्यानंतर सभांबाबत चर्चा होणार आहे”, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. “आमचं हिंदुत्व आणि भाजपच्या हिंदुत्वात फरक आहे. आम्ही देशद्रोहींच्या विरोधात आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सांगलीच्या जागेवर काय म्हणाले?

“प्रत्येक पक्षाचं नेतृत्व खंबीर असावं लागतं. त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं पाहिजे. आघाडी आणि युती होते तेव्हा काही गोष्टी सोडाव्या लागतात. अमरावती, रामटेक आणि कोल्हापूर या जिंकलेल्या जागा आम्ही दिल्या. भाजपला हरवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. त्यामुळे कार्यकर्त्यांना नेतृत्वाने समजून सांगितलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

Follow Us
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.