AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी ! देवेंद्र फडणवीस गायब, सर्वात मोठी उलथापालथ भाजपमध्ये?; दैनिक ‘सामना’तील दावा काय?

ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर सडकून टीका करण्यात आली आहे. राज्यातील सर्वात मोठी घडामोड भाजपमध्ये घडत आहेत. अजित पवार यांच्या नावाने फक्त रेवड्या उठवल्या गेल्या आहेत, असा दावा अग्रलेखातून करण्यात आला आहे.

सर्वात मोठी बातमी ! देवेंद्र फडणवीस गायब, सर्वात मोठी उलथापालथ भाजपमध्ये?; दैनिक 'सामना'तील दावा काय?
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 19, 2023 | 1:09 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या चार दिवसांपासून सुरू आहेत. अजितदादा 40 आमदार घेऊन भाजपसोबत जाणार असल्याचं सांगितलं जात असल्याच्याही चर्चा होत्या. या चर्चांना खुद्द अजित पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. शेवटच्या श्वासापर्यंत आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. याच मुद्द्यावरून दैनिक ‘सामना”च्या अग्रलेखातून हल्ला चढवण्यात आला आहे. शिंदे गट म्हणजे बिनकामाचे ओझे झाले आहे. त्यांना दूर करण्यासाठीच भाजपचे प्रयत्न सुरू आहेत, असं सांगतानाच अजितदादा यांच्याबाबत वावड्या आणि रेवड्या उडवण्यात आल्या. पण अजितदादांनीच त्याला पूर्णविराम दिल्याचं दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून म्हटलं आहे. तसेच राज्यातील सर्वात मोठी उलथापालथ भाजपमध्येच सुरू असल्याचा दावाही अग्रलेखातून करणअयात आला आहे.

महाराष्ट्र राज्य सध्या वावड्या आणि रेवड्या उडवण्यात आघाडीवर आहे. अजित पवार यांच्याबाबतही अशाच वावड्या उडवल्या. ते भाजपसोबत जाणार आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं जाणार आहे, अशा वावड्या उडवण्यात आल्या. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघणार असल्याच्याही चर्चांना उधाण आलं. अजित पवार यांनी आमदारांची बैठक बोलावली असून त्यांच्याकडे 40 आमदारांच्या सह्यांचे पत्र असल्याचंही माध्यमांवर सांगण्यात आलं. पण अजितदादांनी या चर्चांना तिलांजली दिली आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं अजितदादांनी स्पष्ट केलं आहे, असं दैनिक ‘सामना’तील अग्रलेखात म्हटलं आहे.

बावनकुळे आणि शेलार वेलदोडे

वावड्या उठवणाऱ्यांनी राजकीय भान ठेवायला हवे, असा सल्लाही सामनातून देण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे गंमतीशीर गृहस्थ आहेत. त्यांच्या विधानाकडे निव्वळ गंमत म्हणून बघावे लागते. महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या नेत्यांना दिल्लीत बोलावण्यात आले. ते दोन नेते कोण तर बावनकुळे आणि आशिष शेलार. म्हणजे अजित पवारांसारख्या बलदंड नेता 40 आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करतोय. त्याबाबत चर्चा करायला दिल्लीत कोण जात आहेत तर हे दोन वेलदोडे. तेव्हा कोणत्या वावड्या किती गंभीर्याने घ्यायच्या? असा खोचक टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

शिंदे गट बिनकामाचे ओझे

सध्याच्या मुख्यमंत्र्यांमुळे महाविकास आघाडीचे सरकार गेले. आता भाजपसाठी शिंदे गट हा बिनकामाचे ओझे झाला आहे. हे ओझे कसे फेकता येईल यावर महाराष्ट्र आणि दिल्लीत चर्चा सुरू आहे. आश्चर्य म्हणजे कालचे बाहुबली देवेंद्र फडणवीस हे राज्यातील या सगळ्या उपक्रमातून बेपत्ता आहेत. त्यामुळे राज्यात भाजपातच सर्वात मोठी उलथापालथ सुरू आहे की काय? अशी शंका घ्यायला जागा आहे, असा दावा अग्रलेखातून करण्यात आला आहे. कधी शिवसेना तर कधी राष्ट्रवादी फोडून स्वत:चे घर भरायचे काम सुरू आहे. भाजपची काँग्रेसवरही वाईट नजर आहे. अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या वावड्या आणि रेवड्या उठवून वातावरण गढूळ करण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. पण अजितदादांनी हे कारस्थान उधळून लावले आहे, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.