AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादा वारंवार पवारांना भेटणं ‘साथी’चा, तर मुख्यमंत्र्यांनी साताऱ्याला जाणं हा ‘मानसिक’ आजार; दैनिक ‘सामना’तून खवचट टीका

शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीने संभ्रम वाढला आहे. देशी चाणक्य या भेटीसाठी अजित पवारांना ढकलून तर देत नाही ना? या शंकेला बळ मिळत आहे, अशी शंका आणि दावा दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आला आहे.

अजितदादा वारंवार पवारांना भेटणं 'साथी'चा, तर मुख्यमंत्र्यांनी साताऱ्याला जाणं हा 'मानसिक' आजार; दैनिक 'सामना'तून खवचट टीका
cm eknath shindeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 14, 2023 | 8:24 AM
Share

मुंबई | 14 ऑगस्ट 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात वारंवार भेटी होत आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा साताऱ्यातील त्यांच्या दरे या गावी वारंवार जात आहे. त्यावरून दैनिक ‘सामना’तून जोरदार टीका करण्यात आली आहे. अजितदादा पवार हे वारंवार शरद पवार यांना भेटतात हा एक साथीचा आजार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी पडून वारंवार विश्रांतीसाठी साताऱ्यातील शेतावर हेलिकॉप्टरने उतरतात. हा महाराष्ट्राला लागलेला मानसिक आजार आहे. या दोन्ही आजारात गुप्त असे काहीच राहिले नाही, अशी खोचक आणि खवचट टीका दैनिक ‘सामना’तून करण्यात आली आहे.

दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून अजितदादा यांच्या भेटीगाठी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजारपणावरून जोरदार टीका करण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वी अमित शाह पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी गुप्त गाठीभेटी घेतल्या. नेतृत्व बदलावर त्यांच्या चर्चा झाल्या. ही गुप्त बातमी फुटल्यानेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजार बळावला आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या लोकांनी हा आजार गंभीरपणे घेतला पाहिजे. हा रोग राज्याला लागला आहे. त्याचे उच्चाटन लवकरात लवकर केले पाहिजे, असं सांगतानाच आता दिल्लीच्या टोळधाडी महाराष्ट्रावर हल्ला करत आहे. पण तरीही महाराष्ट्र उभा राहील. दोन पवारांची गंमतभेट आणि मुख्यमंत्र्यांचा वाढता आजार हे वैयक्तिक प्रश्न आहेत. पण महाराष्ट्र म्हणजे गंमतजंमत नाही, असा इशाराच दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

सगळ्यांच्या लहान मेंदूला त्रास

यावेळी अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची खिल्लीही उडवली आहे. मुख्यमंत्री 24 तास काम करतात असं सांगितलं जातं. पण त्यांचं काम तर कुठेच दिसत नाही. कधीही पद गमवावे लागेल या भीतीतून मुख्यमंत्र्यांची झोप उडाली आहे. त्यामुळे त्याला 24 तास काम करणे म्हणत नाहीत. मुख्यमंत्री उठसूट हेलिकॉप्टरने साताऱ्यातील दरे गावातील शेतावर आराम करायला जातात. अजित पवार सरकारमध्ये घुसल्याने शिंदे यांच्या हृदयाचे ठोके वाढले असून मन अस्थिर झाले आहेत. त्यातच शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीगाठी वाढल्याने या सगळ्यांच्या लहान मेंदूला त्रास होऊ लागला आहे, अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.

बुवाबाजीने आजार बरा होत नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यात जाऊन गावठी उपचार घेत आहेत. जडीबुटी, जादूटोणा आणि बुवाबाजीच्या माध्यमातून उपचार घेणं योग्य नाही. आरोग्य ही संपत्ती आहे, तिचं रक्षण खोक्यांनी होत नाही. मुख्यमंत्रीपदाचा अमरपट्टा कोणीच घेऊन आलेलं नाही. शिंदे यांना वाटतं मीच शेवटच्या श्वासपर्यंत राहील. पण अजित पवार यांच्या एन्ट्रीमुळे त्यांच्या श्वसननलिकेत अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे त्यांना गुदमरल्यासारखे होत आहे, असा चिमटाही अग्रलेखातून काढण्यात आला आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.