AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काळजाचा जवळचा व्यक्ती शिंदेंच्या शिवसेनेत चालला, ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

उद्धव ठाकरे यांच्या अतिशय जवळचे आमदार रवींद्र वायकर हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी होत आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसणार आहे. वायकर हे ठाकरेंचे विश्वासातले नेते होते.

काळजाचा जवळचा व्यक्ती शिंदेंच्या शिवसेनेत चालला, ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
| Updated on: Mar 10, 2024 | 8:09 PM
Share

मुंबई | 10 मार्च 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय म्हणून ख्याती असलेले आमदार रवींद्र वायकर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ते आज शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यांचा पक्षप्रवेशाचा भव्य कार्यक्रम आज वर्षा बंगला परिसरात पार पडत आहे. जवळपास दीड हजार जण या कार्यक्रमात उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या पक्षप्रवेशावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. त्यांनी आज गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी जनसंवाद कार्यक्रमात रवींद्र वायकर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. तसेच त्यांनी भाजपवरही टीका केली.

“काहीजण आजसुद्धा जात आहेत. जाऊद्या. मी काल म्हटलं, मी काल जोगेश्वरीच्या शाखा भेटीत एक प्रश्न विचारला होता, तोच तुम्हालाही विचारतो. छत्रपती शिवाजी महाराजांना साडेतीनशे वर्ष होऊन गेले. पण साडेतीनशे वर्षांनंतरही खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ, अण्णाजी पंत यांची नावं घेतल्यानंतर आपण त्यांना काय बोलतो? ते साडेतीनशे वर्षांनंतरही त्यांच्या कपाळावरचा गद्दार शिक्का पुसू शकले नाहीत तर आता जे गद्दारी करत आहेत त्यांना पुसायला किती जन्म घ्यावे लागतील?”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

‘प्रत्येकाने ठरवायचं आहे, मी खंडोजी खोपडेची अवलाद आहे की…’

“प्रत्येकाने ठरवायचं आहे, मी खंडोजी खोपडेची अवलाद आहे की, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी यांचा मी वंशज आहे हे आपण ठरवायचं आहे. जे खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळचे औलाद आहेत, तिकडे मिंधे बसलाय. जा त्याच्या दाढीखाली. जाऊ शकता. कारण तो सुद्धा तीच औलाद आहे. गद्दार म्हटल्यावर गद्दारच”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

‘आता जे काही चालले आहेत..’

“आता जे काही चालले आहेत, त्यांचं राजकीय आयुष्य, मी आता काही बोलत नाही. आता होऊ दे. त्यानंतर आपण बोलू. पण तूर्त तुम्ही सगळे जमलेले आहात. मी काल चार विधानसभा मतदारसंघात गेल्यानंतर तिकडे खासदार म्हणून कुणाच्या नावाची घोषणा केली? तुम्ही जबाबदारी घेणार? समोर कुणीही असो, मला नुसता विजय नको, डिपॉजिट जप्त करुन विजय पाहिजे. हा लढा निष्ठावान विरुद्ध गद्दार असा आहे. एका बाजूला देशभक्त आणि दुसऱ्या बाजूला द्वेषभक्त आहेत. असा हा लढा आहे. लोकशाही विरुद्ध हुकूमशाही असा हा लढा आहे. मला असा कुणीही नकोय की, उद्या आपण जिंकल्यानंतर असं म्हणेल की, तुम्ही जिंकलात पण मी नव्हतो तिकडे. अरे जा तू पण जातो. तुला पण आडवा करतो. एवढी ताकद आमच्या शिवसैनिकांमध्ये आहे. हुकूमशाही गाढून काढण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आलो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंची भाजपला शिवीगाळ

“शिवसेनेचं हिंदुत्व हे चूल पेटवणारं हिंदुत्वा आहे आणि भा*** पक्षाचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. हा फरक आहे. मी आज सर्व जात-पातच्या लोकांना आवाहन करतोय की, आपले धर्म, जात बाजूला ठेवून हा देश हाच माझा धर्म आणि देशाच्या लोकशाही रक्षणासाठी आपण सगळे एकत्र येऊयात”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. त्यांनी या वक्तव्यातून भाजपला शिवीगाळ केली.

Follow Us
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार.
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी.
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......