AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackery : हा कडकडीत बंद कशासाठी, उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली भूमिका, सरकारच्या भूमिकेचा घेतला खरपूस समाचार, अत्यावश्यक सेवेबद्दल केले मोठे आवाहन

Maharashatra Bandha : महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्रात बंदची हाक दिली आहे. हा कडकडीत बंद कशासाठी याविषयी उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली. महायुती सरकारने किती आणि कोणतेही आरोप केले तरी बंद कशासाठी करत आहोत, याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

Uddhav Thackery : हा कडकडीत बंद कशासाठी, उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली भूमिका, सरकारच्या भूमिकेचा घेतला खरपूस समाचार, अत्यावश्यक सेवेबद्दल केले मोठे आवाहन
उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्र बंदची हाक
| Updated on: Aug 23, 2024 | 12:32 PM
Share

महाविकास आघाडीने शनिवारी, 24 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यावर महायुती सरकारने टीका केली आहे. बदलापूर अत्याचार घटनेच्या आड महाविकास आघाडी ही राजकारण करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर उद्धव ठाकरे यांनी हा बंद कशासाठी करण्यात आला याची माहिती दिली आहे. त्यांनी यावेळी सरकारच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. या घटनेची जनतेच्या न्यायालयाने दखल घेतली आहे, हे उद्या दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी केले. आज त्यांनी मुंबईत याविषयी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी सर्व नागरिकांना या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

हा बंद कशासाठी?

कालचाच विषय आहे. एकूणच राज्यात जी अस्वस्थता आहे, तोच विषय आहे. मी तुमच्यामाध्यमातून जनतेशी बोलत आहे. राजकीय कारणासाठी बंद नाही. विकृती विरुद्ध संस्कृती यासाठी बंद आहे. पालकांना असं वाटतं की मुलगी शाळेत सुरक्षित राहील का. कार्यालये असतील, रुग्णालये असतील तिथे आपण सुरक्षित राहू का असं माता भगिनींना वाटतकं. या अस्वस्थतेला वाचा फोडण्यासाठी बंद आहे. आम्ही विरोधी आहोत. विकृतीच्या विरोधात आम्ही बंद पुकारत आहोत. आजपर्यंत जसा बंद झाला, तसाच बंद असेल. सर्व नागरिकांचा बंद असेल. जात पात धर्माचा भेद नसेल. याच्या कक्षा ओलांडून सर्वांनी बंदमध्ये यावं. हा सामाजिक प्रश्न आहे. आजपर्यंतच्या बंदसारखाच असेल. कडकडीत बंद असावा. पण त्यात अत्यावश्यक सेवा आहे. पेपर, अग्निशमन दल आरोग्य सेवा चालू राहतील. सणासुदीचे दिवस आहे. गणपती बाप्पा येत आहे. दहीहंडीचा सराव आहे. उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत बंद पाळा. कारण उत्सव आहे. सरकारला काही म्हणू द्या. मी जनतेच्या वतीने बोलतो, असे ठाकरे म्हणाले.

गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका

हा बंद राजकीय असल्याने त्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका दाखल केली आहे. उद्याचा बंद हा बेकायदेशीर असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला आहे.  त्याविषयी माध्यमांनी प्रश्न विचारालं, तेव्हा सदावर्तेंचे नाव न घेता, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. महिलांवरील अत्याचाराविरोधात हा बंद असल्याची भूमिका त्यांनी ठोसपणे सांगितले.

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण