AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐन पावसाळ्यात वसई- विरारकरांचे तोंडचे पाणी पळणार ?,का ते वाचा ?

वसई आणि विरार परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तिष्ठत रहावे लागत असताना यंदाच्या पावसाळ्याने तोंडचे पाणी पळाले आहे. या भागातील नागरिकांच्या समस्यांना कोणी वालीच राहीला नसल्याचे उघड झाले आहे.

ऐन पावसाळ्यात वसई- विरारकरांचे तोंडचे पाणी पळणार ?,का ते वाचा ?
| Updated on: Jun 16, 2025 | 8:22 PM
Share

पावसाने धुमाकुळ घातला आहे. अनेक जलस्रोत पावसाने भरले असून एकीकडे पाणी कपातीचे संकट टळले असताना वसई- विरारकरांच्या तोंडचे पाणी मात्र पळाले आहे. वसई- विरार महानगर पालिकेतील रहिवाशांना येते काही दिवस पाणी जपून वापरण्याच्या सूचना संबंधित महानगर पालिकांनी दिल्या आहेत.

वसई-विरार शहर महानगरपालिकेला सुर्या टप्पा-१ आणि ३ या योजनेतुन २०० दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी उपलब्ध होत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सुर्या पाणी योजनेतून ४०३ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा योजनेतून १५० दशलक्ष लिटर पाणी प्रतिदिन उपलब्ध होत असते. मात्र, वादळी पावसाने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी MSEDCL मार्फत पुरवण्यात येणाऱ्या वीजेत खंड पडत आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे.

MMRDA च्या पाणी पुरवठा योजनेतील कवडास पंपिंग स्टेशन आणि सूर्या नगर जलशुद्धीकरण केंद्र (कासा विक्रमगड) येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी MSEDCL मार्फत विज पुरवठा होत आहे. या भागात दि.१३ जूनपासून वादळी वाऱ्यासह पाऊस होत असल्याने या ठिकाणी विद्युत तारांवर झाडांच्या फांद्यापडून योजनेचा वीजपुरवठा वारंवार खंडीत होत आहे.

सुर्या योजनेतील मासवण आणि धुकटण येथील जलशुध्दीकरण केंद्राच्या ठिकाणी देखील वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असल्याने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मार्फत होणारा वीजपुरवठा दि. १३ जून रोजी पासून वारंवार खंडीत होत आहे.या स्थितीत १६ जून रोजी सकाळी ८.०० वा. पासून MMRDA च्या योजनेतून होणारा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.त्यामुळे वसई-विरार शहरास होणारा पाणी पुरवठा कमी प्रमाणात तसेच कमी दाबाने होत आहे.

कमी दाबाने पाणी पुरवठा

या कारणामुळे पुढील ३ ते ४ दिवस महापालिका क्षेत्रास होणारा पाणी पुरवठा हा अपुऱ्या आणि कमी दाबाने होणार असून नागरीकांनी उपलब्ध पाणी जपुन वापरावे आणि महापालिकेस सहकार्य करावे अशी विनंती महानगर पालिकेने केली आहे.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?