AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidhan Parishad Election : फडणवीस आम्हाला मत देतील, ते आमच्या संपर्कात, बच्चू कडू यांचा खोचक टोला

शिवसेनेच्या बैठकीनंतर बोलताना बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी अशीच एक खोचक प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस (Devendra Fadnavis) आमच्या संपर्कात आहे, ते आम्हालाच मतदान करतील असा विश्वास आम्हाला आहे, अशी मिश्कील प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Vidhan Parishad Election : फडणवीस आम्हाला मत देतील, ते आमच्या संपर्कात, बच्चू कडू यांचा खोचक टोला
फडणवीस आम्हाला मत देतील, ते आमच्या संपर्कात, बच्चू कडू यांचा खोचक टोलाImage Credit source: tv9
| Updated on: Jun 18, 2022 | 5:32 PM
Share

मुंबई : निवडणुकीच्या काळात सर्वात जास्त ऐकायला मिळणारं वाक्य म्हणजे…ते आमच्या संपर्कात आहेत…आमचा संवाद सुरू आहे…विजय आमचाच होणार…आता विधान परिषदेच्या निवडणुकीतलं (Vidhan Parishad Election) चित्रही असेच काहीसं आहे. सर्वच राजकीय पक्ष अपक्ष आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा करत आहेत. त्याचबरोबर आपल्या सर्व उमेदवरांच्या विजयाचा दावा करत आहेत. मात्र तसं होणार नाही हेही सर्वांना महिती आहे. कारण विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आता 11 उमेदवार मैदानात उतरले आहेत. त्यामुळे एकाचा पत्त कट होणार हे निश्चित आहे. दुसरीकडे सर्वच राजकीय पक्षांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. आज मुंबई, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांच्या आपआपल्या गोटात बैठका सुरू पार पडत आहेत. शिवसेनेच्या बैठकीनंतर बोलताना बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी अशीच एक खोचक प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस (Devendra Fadnavis) आमच्या संपर्कात आहे, ते आम्हालाच मतदान करतील असा विश्वास आम्हाला आहे, अशी मिश्कील प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

नेमकं काय घडलं?

आज शिवसेनेच्या आमदरांनी मतदान कसे करावे याबाबत रंगीत तालीम पार पडलीय. याबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले, आज मतदान कसे करावे याबाबत ट्रायल होती. एकदा चुकलो म्हणून परत चुकू नये यासाठी काळजी घेतोय. मुख्यमंत्री आमच्याशी हितगुज करणार आहेत.तर भाजप नेते अपक्ष आपल्या संपर्कात असल्याचा दावा करत आहे असे विचारल्यावर बच्चू कडू म्हणाले, आम्ही पण संपर्कात आहोत की देवेंद्रजी आम्हाला कसं मत देतील, तसेच मला पूर्ण विश्वास आहे की देवेंद्रजी आम्हाला मत देतील, असा टोला त्यांनी लगावला आहे.

भाजपचा विजयाचा दावा

विधानपरिषदेच्या पाचही जागा भाजपा जिंकेल असा दावा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी केला आहे. महाविकास आघाडी मध्ये असंतोष आहे .आमदारांची कामे होत नाहीत, महाराष्ट्राचा विकास खुंटला आहे. येत्या विधान परिषद निवडणुकीत आमदारांचा असंतोष बाहेर येईल आणि 5 वी जागा भाजपा जिंकेल असा दावाही कराड यांनी केला आहे . आज कराड उस्मानाबाद दौऱ्यावर आले होते, त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत कराड यांनी हा दावा केला आहे. दरम्यान पंकजा मुंडे माझ्या नेत्या आहेत असं सांगत कराड यांनी पंकजा मुंडे यांच्या नाराजी विषयी बोलणे टाळले आहे. आता कराडांचा दावा किती खरा ठरतो हे तर विधान परिषदेत्या निवडणुकीचे निकालच सांगतली.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.