AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Vadettiwar: खरातच्या जागी जर एखादा मुसलमान असता तर… विजय वडेट्टीवार यांच्या विधानाने शिलगला वाद, असे काढले माप

Vijay Vadettiwar on Ashok Kharat: भोंदू अशोक खरात प्रकरणात अजून एकही राजकीय व्यक्तीला धडा बसलेला नाही. अशोक खरातविरोधात अनेक महिला, व्यापारी धाडसाने पुढे येत असले तरी त्याच्यासोबत व्यवहार झालेल्या नेत्यांवर मात्र कारवाई झालेली नाही. या सर्व प्रकरणाचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

Vijay Vadettiwar: खरातच्या जागी जर एखादा मुसलमान असता तर... विजय वडेट्टीवार यांच्या विधानाने शिलगला वाद, असे काढले माप
विजय वडेट्टीवार, अशोक खरातImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 11, 2026 | 12:21 PM
Share

Vijay Vadettiwar on Ashok Kharat: भोंदू अशोक खरात प्रकरणाने नाशिकच नाही तर राज्य आणि देश हादरला आहे. या भोंदूबाबामुळे राज्याची प्रतिमा मलिन झाली आहे. त्याच्यासोबत अनेक राजकीय नेत्यांच्या बैठका आणि व्यवहार आता लपलेले नाहीत. अनेक महिला आणि व्यापारी धाडसाने त्याच्याविरोधात पुढे सरसावल्या आहेत. राजकीय वलयाचा फायदा घेत खरातने अनेकांचे जीव नासवले. विरोधक खरातप्रकरणावरून सरकार आणि यंत्रणांना टार्गेट करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीकेची संधी सोडली नाही.

मुसलमान असता तर…

अशोक खरात याच्या जागी जर एखादा मुसलमान असता तर सर्व मुसलमानांची वरात काढली असती असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले. जात धर्म न पाहता नालायक व्यक्तीला नालायक म्हणण्याची हिंमत समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे असे त्यांनी ठणकावून सांगितले. त्यांनी याप्रकरणात समाजाची आणि सध्याच्या मानसिकतेची कानउघडणी केली.

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपुरात तीन दिवसीय महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. या महोत्सवा अंतर्गत आज संध्याकाळी चंद्रपूर शहरातील गांधी चौक येथे श्रीमंत कोकाटे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. या व्याख्यानाचे उद्घाटक म्हणून माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार हे उपस्थित होते, त्यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

खरात प्रकरण सरकारनेच बाहेर काढले

तर वडेट्टीवार यांच्या या विधानावर गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जेव्हा हे प्रकरण आले. तेव्हा नाशिक पोलिसांना त्यांनी सूचना दिली. गुप्तपणे त्याला रात्रीतून अटक करण्यात आली आहे. त्याला अटक करण्यात आणि हे प्रकरण बाहेर काढण्यात सरकारचाच हात असल्याचा दावा पडळकर यांनी केला आहे. सरकार आणि विरोधकांमध्ये खरात प्रकरणावरून द्वंद सुरू आहे. तर खरात याचे दिवसागणिक एक एक प्रकरणं बाहेर येत आहेत. तर याप्रकरणाच्या अवतीभोवती राजकीय कथाही रचल्या जात आहे. त्यात खरात आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा ही करण्यात येत आहे.

Follow Us
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....