AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Rain | पुढचे 3 ते 4 तास अतिमहत्त्वाचे, महाराष्ट्रातील ‘या’ सहा जिल्ह्यांना अलर्ट, काळजी घ्या

महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांसह अनेक जिल्ह्यांमध्ये आज धुवांधार पाऊस पडतोय. हवामान विभागाने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे हवामान विभागाकडून पुढच्या काही तासांसाठी अलर्टही जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Rain | पुढचे 3 ते 4 तास अतिमहत्त्वाचे, महाराष्ट्रातील 'या' सहा जिल्ह्यांना अलर्ट, काळजी घ्या
| Updated on: Sep 08, 2023 | 2:58 PM
Share

मुंबई | 8 सप्टेंबर 2023 : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात हवा तसा पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले होते. याशिवाय धरणांमधील पणासाठा देखील संपत आल्याने प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली होती. पाऊस पडला नाही तर भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या संकटाला सामोरं जावं लागेल, अशी भीती वर्तवली जात होती. त्यामुळे सर्वजण पाण्याची चातकासारखी वाट पाहत होती. अखेर सर्वांची हाक पावसाने ऐकली आणि गेल्या दोन दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये पावासाने हजेरी लावली आहे. काही जिल्ह्यांमध्ये पाऊस चांगलाच मुसळधार कोसळतोय. पण त्याचं हे कोसळणं जरुरुीचं आहे. कारण अजूनही हवा तितक्या स्वरुपात पाऊस झालेला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुरेशा पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.

हवामान विभागाने पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. हवामान विभागाने राज्यातील सहा जिल्ह्यांच्या नागरिकांना पुढच्या तीन ते चार तासांसाठी सावधानतेचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचं पुनरागमन झालंय. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पोहोचला नसला तरी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पुणे या सहा जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. या सहा जिल्ह्यांसाठी पुढचे तीन ते चार तास महत्त्वाचे आहेत.

हवामान विभागाचा नेमका अलर्ट काय?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे या सहा जिल्ह्यांमधील अनेक भागांमध्ये पुढच्या तीन ते चार तासांमध्ये मध्यम ते तीव्र स्वरुपांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधील नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अद्यापही पाऊस हवा तसा पोहोचू शकलेला नाही. अनेक ठिकाणी पाऊस हा रिमझिम पडताना दिसतोय. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. पुरेसा पाऊस नसल्यामुळे पिकं पूर्णपणे करपली आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला सरकारकडे आशा आहे. सरकार दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा देईल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.