Anil Parab : रामदास कदम यांच्या बायकोने स्वत:ला का जाळून घेतलं? नार्को टेस्ट झालीच पाहिजे; अनिल परबांचा रामदास कदमांवर मोठा बॉम्ब

Anil Parab on Ramdas Kadam : शिंदे सेनेचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांच्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर आज ठाकरे सेनेचे नेते अनिल परब यांनी कदमांवर मोठा बॉम्ब टाकला. त्यांनी आरोपांची राळ उडवली.

Anil Parab : रामदास कदम यांच्या बायकोने स्वत:ला का जाळून घेतलं? नार्को टेस्ट झालीच पाहिजे; अनिल परबांचा रामदास कदमांवर मोठा बॉम्ब
अनिल परब, रामदास कदम
| Updated on: Oct 04, 2025 | 1:14 PM

दसरा मेळाव्यात शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. बाळासाहेब ठाकरे यांचा देह दोन दिवस का ठेवला, बोटाचे ठसे का घेतले असे प्रश्न उपस्थित करत शिंदे सेनेचे नेते रामदास कदम यांनी आरोपांची राळ उडवून दिली. राजकीय पटलावर यामुळे मोठी खळबळ उडाली. त्याला आज ठाकरे सेनेच्या कॅम्पमधून प्रखर उत्तर मिळाले. अनिल परब यांनी कदमांवर मोठा बॉम्ब टाकला. त्यांनी कदमांवर गंभीर आरोप केले.

कदमांच्या बायकोने जाळून घेण्याचा प्रयत्न का केला?

1993 मध्ये ज्योती रामदास कदम यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला, जाळून घेण्याचा प्रयत्न केला. जाळून घेतलं की जाळलं? आजही खेडमध्ये घटनेचे साक्षीदार आहेत. गरज पडली तर त्यांनाही मी समोर आणेल. खूप साक्षीदार आहेत. म्हणून आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून ही संस्कृती बंद करा, असा हल्ला अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर चढवला. तर गृहराज्यमंत्री आणि रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांनाही त्यांनी डिवचले.

आज गृहराज्य मंत्र्याची ताकद दाखवताना डान्सबारवर जाऊन रेड मारल्याचं दाखवताना, मग स्वत च्या घरात काय चाललंय त्याची चौकशी करा. १९९३ मध्ये तुमच्या आईने का आत्महत्या करायचा प्रयत्न केला. स्वत: ला का जाळून घेण्याचा प्रयत्न कर. त्याची चौकशी केली पाहिजे. नार्को टेस्ट झाली पाहिजे, अशी मागणी उद्धव सेनेचे नेते अनिल परब यांनी केली.

या अधिवेशनात पुरावे सादर करणार

आताच घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी रामदास कदम आणि योगेश कदम या पित्रापुत्रांविरोधात आरोपांची राळ उडवून दिली. या अधिवेशनात जे पुरावे आले. मागच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी त्यांना वाचवलं आहे. आमचा मुख्यमंत्र्यांवर आरोप आहे. अशा शिशुपलांना तुम्ही का वाचत आहात. तुमची अशी काय मजबुरी आहे. त्यांना का वाचवत आहेत. अस सवाल परब यांनी केला.

मागच्या अधिवेशनात तर दोनच प्रकरण आली बाहेर. या अधिवेशनात पुराव्यासकट प्रकरणं देणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की तुम्ही किती वेळा यांना वाचवणार. तुम्ही किती वेळा बदनामी करताय सरकारची. तुमचं सरकार यांच्या मुळे डागळलं जातंय. मुख्यमंत्र्यांनी प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी असे नासके आंबे हाकलून दिले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.