AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMCची हायटेक मोहीम ! समुद्रातील कचरा हटवण्यासाठी इलेक्ट्रिक बोटी तैनात

मुंबईत सागरी कचरा साफ करण्यासाठी इलेक्ट्रिक, चालकविरहित बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. रिमोट कंट्रोलने चालवल्या जाणाऱ्या या बोटी दररोज 80 ते 90 किलोग्रॅम तरंगणारा कचरा गोळा करतात, असा दावा केला जात आहे.

BMCची हायटेक मोहीम ! समुद्रातील कचरा हटवण्यासाठी इलेक्ट्रिक बोटी तैनात
BMCची हायटेक मोहीम !
| Updated on: May 21, 2026 | 11:12 AM
Share

समुद्र.. मुंबईकरांसाठी खास, अभिमानास्पद असणारा हा समुद्र अनेक पर्यटकांचेही लक्ष वेधून घेतो. मात्र या समुद्रात मोठ्या प्रमाणात कचराही टाकला जातो. तोच हटवण्यासाठी आता मोहीम सुरू करण्यात आली असून त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. मुंबईत सागरी कचरा हटवण्यासाठी मानवरहित बोटींचा वापर केला जात आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) गेटवे ऑफ इंडिया आणि बढवार पार्क येथील सागरी कचरा हटवण्यासाठी दोन इलेक्ट्रिक बोटी तैनात केल्या आहेत. या बोटींच्या मदतीने दररोज अंदाजे 80 ते 90 किलोग्रॅम तरंगता कचरा गोळा केला जातो असा दावा बीएमसीने केला आहे.

किनारी भागाची आणि त्याच्या आसपासच्या परिसराची स्वच्छता राखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारी देशातील बीएमसी ही पहिली महानगरपालिका ठरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या इलेक्ट्रिक बोटींच्या माध्यमातून परिसरातून दररोज अंदाजे 80 ते 90 किलो तरंगता कचरा गोळा केला जातो. स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी उचलण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या मालिकेचा हा उपक्रम एक भाग असल्याचे समजते

रिमोट कंट्रोल बोट

रिमोट-कंट्रोल बोटी या अगदी दूरवरून कचरा गोळा करू शकतात. या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाबद्दल प्रकल्प प्रमुख निलेश वाकोडे यांनी माहिती दिली. ” हाताने कचरा गोळा करणे हे अतिशय वेळखाऊ काम आहे. त्यामुळे, कचरा गोळा करण्यासाठी आता रिमोट कंट्रोलने चालणारी ही चालकविरहित बोट वापरली जात आहे. समुद्रकिनाऱ्यावर आढळणारा कचरा गोळा करून, त्याचे वर्गीकरण केले जाते आणि तो पुनर्वापरासाठी पाठवला जातो” असं ते म्हणाले.

या उपक्रमामुळे समुद्र स्वच्छ होतो, त्याचे सौंदर्य वाढतचं आणि समुद्रातील प्लास्टिकचे प्रमामही कमी होतं. या इलेक्ट्रिक बोटची रेंजची जवळपास 500 मीट आहे. बॅटरीवर ही नाव चालते आणि त्यावर सोलर पॅनेलही लागलं आहे, अशीही माहिती निलेश यांनी दिली.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल