AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMCची हायटेक मोहीम ! समुद्रातील कचरा हटवण्यासाठी इलेक्ट्रिक बोटी तैनात

मुंबईत सागरी कचरा साफ करण्यासाठी इलेक्ट्रिक, चालकविरहित बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. रिमोट कंट्रोलने चालवल्या जाणाऱ्या या बोटी दररोज 80 ते 90 किलोग्रॅम तरंगणारा कचरा गोळा करतात, असा दावा केला जात आहे.

BMCची हायटेक मोहीम ! समुद्रातील कचरा हटवण्यासाठी इलेक्ट्रिक बोटी तैनात
BMCची हायटेक मोहीम !
| Updated on: May 21, 2026 | 11:12 AM
Share

समुद्र.. मुंबईकरांसाठी खास, अभिमानास्पद असणारा हा समुद्र अनेक पर्यटकांचेही लक्ष वेधून घेतो. मात्र या समुद्रात मोठ्या प्रमाणात कचराही टाकला जातो. तोच हटवण्यासाठी आता मोहीम सुरू करण्यात आली असून त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. मुंबईत सागरी कचरा हटवण्यासाठी मानवरहित बोटींचा वापर केला जात आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) गेटवे ऑफ इंडिया आणि बढवार पार्क येथील सागरी कचरा हटवण्यासाठी दोन इलेक्ट्रिक बोटी तैनात केल्या आहेत. या बोटींच्या मदतीने दररोज अंदाजे 80 ते 90 किलोग्रॅम तरंगता कचरा गोळा केला जातो असा दावा बीएमसीने केला आहे.

किनारी भागाची आणि त्याच्या आसपासच्या परिसराची स्वच्छता राखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारी देशातील बीएमसी ही पहिली महानगरपालिका ठरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या इलेक्ट्रिक बोटींच्या माध्यमातून परिसरातून दररोज अंदाजे 80 ते 90 किलो तरंगता कचरा गोळा केला जातो. स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी उचलण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या मालिकेचा हा उपक्रम एक भाग असल्याचे समजते

रिमोट कंट्रोल बोट

रिमोट-कंट्रोल बोटी या अगदी दूरवरून कचरा गोळा करू शकतात. या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाबद्दल प्रकल्प प्रमुख निलेश वाकोडे यांनी माहिती दिली. ” हाताने कचरा गोळा करणे हे अतिशय वेळखाऊ काम आहे. त्यामुळे, कचरा गोळा करण्यासाठी आता रिमोट कंट्रोलने चालणारी ही चालकविरहित बोट वापरली जात आहे. समुद्रकिनाऱ्यावर आढळणारा कचरा गोळा करून, त्याचे वर्गीकरण केले जाते आणि तो पुनर्वापरासाठी पाठवला जातो” असं ते म्हणाले.

या उपक्रमामुळे समुद्र स्वच्छ होतो, त्याचे सौंदर्य वाढतचं आणि समुद्रातील प्लास्टिकचे प्रमामही कमी होतं. या इलेक्ट्रिक बोटची रेंजची जवळपास 500 मीट आहे. बॅटरीवर ही नाव चालते आणि त्यावर सोलर पॅनेलही लागलं आहे, अशीही माहिती निलेश यांनी दिली.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला