AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray: अरे मग थांबवलंय कोणी…लपून छपून…सत्याच्या मोर्चात राज ठाकरेंचा हल्लाबोल, महायुतीवर संतापले!

विरोधकांच्या सत्याच्या मोर्चामध्ये राज ठाकरे यांनी जोरदार भाषण केले. या भाषणात राज ठाकरे यांनी सत्ताधारी यांच्यावर सडकून टीका केली आहे. मतदार याद्या स्वच्छ केल्यानंतरच निवडणुका घ्या, अशी मागणी त्यांनी केली.

Raj Thackeray: अरे मग थांबवलंय कोणी...लपून छपून...सत्याच्या मोर्चात राज ठाकरेंचा हल्लाबोल, महायुतीवर संतापले!
raj thackeray
| Updated on: Nov 01, 2025 | 3:22 PM
Share

MNS MVA Mumbai Protest : मुंबईत विरोधकांनी आयोजित केलेल्या सत्याच्या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले. या मोर्चात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात तसेच अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या मोर्चाच्या माध्यमातून मतदारयाद्या स्वच्छ करा, दुबार मतदारांची नावे हटवा, या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, मोर्चाचे सभेत रुपांतर झाल्यानंतर प्रमुख नेत्यांची भाषणे झाली. राज ठाकरे यांनीदेखील जोरदार भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी सत्ताधारी महायुतीवर सडकून टीका केली. मतदार याद्यांतील घोळ संपवल्याशीवाय निवडणुका घेऊ नका, अशी मागणी  राज ठाकरे यांनी केली.

अरे तुम्हाला मग आडवलं कुणी

एखादे वर्ष निवडणूक लांबवली तर काही फरक पडणार नाही. अगोदर मतदार याद्या स्वच्छ करा. शेकडो दुबार मतदार आहेत. मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे. दिल्लीपर्यंत समजावून सांगण्याचा हा मोर्चा आहे. तुम्ही ताकदीने मोर्चाला जमले आहात. मतदार याद्यांचा हा विषय फार मोठा नाही. आम्ही बोलत आहोत. उद्धव ठाकरे बोलत आहेत. शरद पवार बोलत आहेत. यात दुबार मतदार आहेत, असे सांगत आहोत. शेतकरी कामगार पक्ष बोलत आहे. कम्युनिस्ट पार्टी, काँग्रेसचे लोक बोलत आहे. भाजपचे लोकही बोलत आहेत दुबार मतदार आहेत. शिंदेंची लोक बोलत आहेत. अजित पवारांचे लोक बोलत आहेत दुबार मतदार आहे, असे म्हणत अरे तुम्हाला मग आडवलं कुणी. निवडणूक घेण्याची घाई का करत आहात, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

मतदार याद्या साफ केल्यावर निवडणूक घ्या

साधी गोष्ट आहे, मतदार याद्या साफ करा. मतदार याद्या साफ केल्यावर निवडणूक घ्या. यश कुणाचं अपयश कुणाचं मान्य होईल. सर्व लपूनछपून करण्याची गरज काय. कल्याण ग्रामीण, डोंबिवली, भिवंडी आणि मुरबाड भागात ४ हजार ५०० मतदार हे दुबार आहेत. इकडच्या मतदारांनी मलबार हिल मतदारसंघातही मतदान केलं आहे.  असे लाखो लोक आहेत महाराष्ट्रात की जे या मतदानासाठी वापरले गेले, असा आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला.

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.