AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरातून बाहेर पडू नका! विदर्भात उष्णतेची भीषण लाट, प्रशासनाने जारी केला हीट ॲक्शन प्लॅन

नागपुरात वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर उपाययोजना जाहीर केल्या आहेत. दुपारच्या सत्रात कोचिंग क्लासेस आणि औद्योगिक कामगारांना विश्रांती बंधनकारक करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी पाणी व सुरक्षिततेची तरतूद, तर महाविद्यालयांना दुपारच्या परीक्षा टाळण्याचे निर्देश दिले आहेत. रुग्णालयांनाही 'हीट ॲक्शन प्लान' सज्ज ठेवण्यास सांगितले आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी ही व्यापक पाऊले उचलण्यात आली आहेत.

घरातून बाहेर पडू नका! विदर्भात उष्णतेची भीषण लाट, प्रशासनाने जारी केला हीट ॲक्शन प्लॅन
उन्हाचा कहर वाढला
| Updated on: May 17, 2026 | 10:08 AM
Share

निम्मा मे महीना सरत आला तरी अजूनही उन्हा तडाखा कायम असून वाढत्या उन्हामुळे सर्वांच्याच तोंडचं पाणी पळालं आहे. राज्यभरात तसेच विदर्भातही तापमानाचा पारा वाढलेलाच आहे. काल अमरावती आणि वर्धा जिल्ह्याचा पारा पोहचला 46 वर तर अकोला आणि यवतमाळ 45 पार पोहोचल होता. तसेच नागपूरमध्येही उन्हाने कहर केला आहे. जिल्ह्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्णतेच्या लाटेचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून, ते लक्षात घेऊनच जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापक उपायोजनांचे आदेश जारी केले आहेत.

वाढत्या उष्णचेता प्रभाव, कोचिंग क्लासवर बंदी

वाढतं ऊन आणि उष्णता पाहता काही महत्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. नागपुरात वाढत्या उष्णतेचा प्रभाव बघता उष्णतेमुळे दुपारी कोचिंग क्लासेस वर बंदी घालण्यात आली आहे. सर्व कोचिंग क्लासेसचे वर्ग हे सकाळी आणि सायंकाळच्या सत्रातच घेण्याचे निर्देश देण्यात आलेत. दुपारी 11 ते सायंकाळी 4.30 या वेळेत क्लासेस घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी क्लासेसमध्ये मुबलक पाण्याची व्यवस्था करण्यासही सांगण्यात आलं आहे

एवढंच नव्हे तर महाविद्यालये, कॉलेजनेसनेही शक्यतो दुपारच्या सत्रात परीक्षा घेणं टाळावं असंही सांगण्यात आलं आहे. मात्र परीक्षा पूर्वनियोजित असल्यास विद्यार्थ्यांना थंड पिण्याचं पाणी देणं, तसेच परीक्षा हॉल थंड ठेवण्याची व्यवस्था करावी लागणार आहे.

कारखाने आणि बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठीही विशेष निर्देश

उद्योग कारखाने आणि बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी ही विशेष निर्देश देण्यात आले आहेत. दुपारी 11 ते 4 या वेळात कामगारांना विश्रांती देण्यात यावी असे सांगण्यात आलं आहे. तसेच उघड्यावर काम करण्यास मनाई करण्यात आली आहे. कामगारांना त्यांचं काम सुरू ठेवणं अत्यावश्यक असेल तर सावलीसाठी शेड आणि थंड पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी असणे गरजेचे आहे, असे निर्देश सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. एवढंच नव्हे तर रुग्णालयात हीट ॲक्शन प्लान सज्ज ठेवण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत

विदर्भात तापमानाचा पारा वाढलेलाच

विदर्भात तापमानाचा पारा वाढलेलाच असून काल अमरावती आणि वर्धा जिल्ह्याचा पारा पोहचला 46 वर तर अकोला आणि यवतमाळ 45 पार तापमान होतं.

अकोला – 45.4

अमरावती – 46.0

वर्धा – 46.0

नागपूर – 43.8

बुलढाणा – 41.0

चंद्रपूर – 43.6

गोंदिया – 42.2

गडचिरोली – 42.6

यवतमाळ – 45.2

वाशीम – 43.2

Follow Us
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी.
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........