AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूरसह रत्नागिरीत ऑटोरिक्षाचा प्रवास महागला; प्रति किलोमीटरमागे चार रुपयांची वाढ, प्रवाशांना आर्थिक फटका

आज नागपूरसह रत्नागिरीमध्ये ऑटो रिक्षाच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे. भाडे प्रति किलोमिटरमागे चार रुपयांनी वाढवण्यात आले आहे.

नागपूरसह रत्नागिरीत ऑटोरिक्षाचा प्रवास महागला; प्रति किलोमीटरमागे चार रुपयांची वाढ, प्रवाशांना आर्थिक फटका
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: tv9
| Updated on: Jun 15, 2022 | 9:14 AM
Share

नागपूर : नागपूरकरांसाठी (Nagpur) महत्त्वाची बातमी आहे. नागपूरकरांना आता रिक्षाच्या (Auto rickshaw) प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. ऑटोरिक्षाचा प्रवास महाग झाला आहे. प्रति कोलोमीटरमागे रिक्षाच्या भाड्यात (Fare increase) चार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता एक किलोमीटरसाठी 18 रुपये तर दीड किलोमीटरसाठी 27 रुपयांचे भाडे द्यावे लागणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ पहायला मिळत आहे. तसेच आरबीआयकडून रेपो रेट वाढवण्यात आल्याने वाहन कर्ज देखील महाग झाले आहे. वाहन करात देखील वाढ करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून भाडेवाढ करण्यात यावी अशी मागणी रिक्षाचालकांकडून सुरू होती. अखेर आज भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपुरात तब्बल आठ वर्षांनंतर आरटीओकडून भाड्यात वाढ करण्यात आली आहे.

रिक्षाचालकांना मोठा दिलासा

आरटीओकडून भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रति कोलोमीटरमागे रिक्षाच्या भाड्यात चार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे रिक्षाचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या  काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर जरी असले तरी पूर्वीच त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे आरबीआयने रेपो रेट वाढवल्याने वाहन कर्ज देखील महाग झाले आहे. वाहन कर्जाच्या ईएमआयमध्ये वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर वाहन करामध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर रिक्षाचालकांना व्यवसाय करणे कठिण झाले होते. मात्र आता भाडेवाढ करण्यात आल्याने या निर्णयामुळे रिक्षाचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रत्नागिरीत भाडेवाढ

दरम्यान दुसरीकडे आज रत्नागिरीमध्ये देखील रिक्षाच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे. शहरात रिक्षाचे भाडे प्रति किलोमीटरमागे चार रुपयांनी वाढवण्यात आले आहे. त्यामुळे आता पहिल्या दीड किलोमीटरसाठी ग्राहकांना 31 रुपये मोजावे लागणार आहेत. तर त्यानंतर पुढील प्रत्येक दीड किलोमीटरसाठी 20.49 रुपये मोजावे लागणार आहेत. खटूआ समितीने केलेल्या निर्देशानुसार ही भाडेवाढ करण्यात आल्याचे आरटीओच्या वतीने सांगण्यात आले. एकीकडे भाडेवाढ करण्यात आल्याने रिक्षाचालकांना दिलासा मिळाला आहे. मात्र दुसरीकडे या भाडेवाढीचा अतिरिक्त भार आता प्रवाशांच्या खिशावर पडणार आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक धक्का बसला आहे.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.