AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप सत्तेसाठी काहीही करू शकते;” नाना पटोले असं का म्हणालेत?

गिरीश बापट यांची प्रकृती खराब असताना प्रचाराला उतरवले. यावरून सत्तेसाठी भाजप काहीही करू शकते, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

भाजप सत्तेसाठी काहीही करू शकते; नाना पटोले असं का म्हणालेत?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेImage Credit source: tv9 marathi
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Feb 17, 2023 | 12:49 PM
Share

नागपूर : कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कसबा हा भाजपचा बालेकिल्ला असल्याने भाजपने कंबर कसली आहे. कसब्यातून पाच वेळा गिरीश बापट आमदार राहिले आहेत. वय झाल्याने त्यांची प्रकृती बरी राहत नाही. तरीही त्यांना भाजपने प्रचारात उतरविले आहे. यावर आधी राष्ट्रवादीने टीका केली. आजारपणात प्रचारात उतरवून भाजप गिरीश बापट यांच्या जीवाशी खेळत असल्याचं म्हटलं. आता काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनीही यावरून भाजपवर निशाणा साधला. गिरीश बापट यांची प्रकृती खराब असताना प्रचाराला उतरवले. यावरून सत्तेसाठी भाजप काहीही करू शकते, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

नाना पटोले म्हणाले, सत्तासंघर्षाचं प्रकरण न्यायालयात सुरू आहे. निकाल आल्यावर प्रतिक्रिया देता येईल. निकालाची वाट बघतोय. न्याय मिळेल. पण विलंब झाला आहे. संविधानिक सरकार चालत आहे. हे चुकीचे असल्याचंही ते म्हणाले.

अमित शहा दौऱ्याबाबत बोलताना नाना पटोले यांनी म्हटलं की, देशातील परिस्थितीवर भूमिका अमित शहा यांनी मांडावी. गृहमंत्री यांनी व्यक्तिगत कार्यक्रमापेक्षा शेती मालाला भाव नाही. शेतकरी आत्महत्या करत आहे. त्यावर लक्ष द्यावे.

गुन्हेगारांना घेऊन मंत्री फिरतात

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. तरुणांना फसवण्याचं काम सुरू आहे. तडीपार गुंडाचा वापर भाजप करत आहे. पोलिसांच्या सरंक्षणात गुन्हेगारांना मंत्री घेऊन फिरत आहेत, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.

देशाला उंचीवर नेण्यासाठी माजी पंतप्रधान यांनी महत्वाची भूमिका केली. आजही देशाची परिस्थिती वाईट आहे. याचा अभ्यास असणारे लोक कॉंग्रेसजवळ आहेत. देशाची संविधान व्यवस्था टिकवणारे नेते काँग्रेसजवळ आहेत.

भाजपकडून लोकशाहीचा खून

देशभरात काँग्रेसचे नेते वेगवेगळ्या राज्यात जात आहेत. अदानीबरोबर नरेंद्र मोदी यांचा काय संबंध आहे, हे जनतेसमोर मांडणार आहे. लोकशाहीचा खून भाजप करत आहे. याचा विरोधात जनतेपर्यंत जाऊन वास्तव काँग्रेस मांडणार आहे, असंही नाना पटोले यांनी सांगितलं.

बीबीसी छाप्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, भीती दाखवून राजनीती करण्याचे काम भाजप करत आहे. त्यामुळे भाजप विरोधात बोलले म्हणून बीबीसीवर इन्कम टॅक्सची रेड केली आहे. देशाची जनता माफ करणार नाही.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार