स्ट्रीटलाईट, पाणीपुरवठ्याचे वीजबील ग्रामपंचायतींना भरावे लागणार, निर्णय मागे घ्या अन्यथा रस्त्यावर उतरणार, भाजपचा इशारा

वीजबील न भरल्यास सरपंच आणि ग्रामसेवकावर कारवाई केली जाईल असे परिपत्रकही राज्य सरकारने काढलं आहे. सरकारच्या या निर्णयाचा भाजपने तसेच माजी उर्जीमंत्री चंदशेखर बावनकुळे यांनी निषेध केला आहे.

स्ट्रीटलाईट, पाणीपुरवठ्याचे वीजबील ग्रामपंचायतींना भरावे लागणार, निर्णय मागे घ्या अन्यथा रस्त्यावर उतरणार, भाजपचा इशारा
Chandrashekhar-Bawankule
Follow us
| Updated on: Sep 11, 2021 | 6:50 PM

नागपूर : गावातील पाणीपुरवठा आणि स्ट्रीट लाईटचे वीजबील ग्रामपंचायतीने भरावे असा निर्णय राज्य सरकारनं घेतला. बील न भरल्यास सरपंच आणि ग्रामसेवकावर कारवाई केली जाईल असे परिपत्रकही राज्य सरकारने काढलं आहे. सरकारच्या या निर्णयाचा भाजपने तसेच माजी उर्जीमंत्री चंदशेखर बावनकुळे यांनी निषेध केला आहे. तसेच हा निर्णय लवकरात लवकर परत घ्यावा अशी मागणीदेखील बावनकुळे यांनी केली. राज्य सरकारने हा निर्णय परत घेतला नाही, तर आगामी काळात भाजपकडून राज्यभर आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. (chandrashekhar bawankule criticizes maharashtra government on street light and electricity bill of villages)

पाणीपुरवठ्याचे वीजबील ग्रामपंचायतीला भरावे लागणार

मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारने वीजबिलासंदर्भात राज्य सरकारने नुकतेच एक परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार गावातील स्ट्रीट लाईट तसेच पाणीपुरवठ्याचे वीजबील ग्रामपंचायतीला भरावे लागणार आहे. तसेच हे बील न भरल्यास संबंधित ग्रामसवेक तसेच सरपंच यांच्यावर कारवाई केली जाईल, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आलंय. सरकारच्या याच निर्णयाविरोधात भाजपने दंड थोपटले आहेत. भाजप नेते आणि माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय राज्य सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच राज्य सरकारने आमची मागणी मान्य केली नाही तर राज्यभर आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

राज्य सरकारच्या  निर्णयाचा फटका 27 हजार ग्रामपंचायतींना

तसेच पुढे बोलताना 15 व्या वित्त आयोगाचा निधी राज्य शासनाला मिळाला आहे. ग्रामविकासासाठी निधी आला असताना तो इतरत्र वळता केला जातोय. राज्य सरकारच्या या निर्णयाचा फटका 27 हजार ग्रामपंचायतींना बसतोय. 50 टक्के गावं अंधारात आहेत. मागच्या 40 वर्षांपासून गावातील स्ट्रीट लाईटचं बील राज्य सरकार भरत होतं. मात्र, आता महाविकास आघाडी सरकारनं ते बंद केलंय. त्यामुळं हा निर्णय रद्द करावा. अन्यथा आंदोलन केले जाईल, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

इतर बातम्या :

राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ, नीलम गोऱ्हेंनी मुख्यमंत्र्यांना दिले 4 महत्वाचे सल्ले

भगतसिंह कोश्यारी उत्तराखंडमध्ये परतणार ? …तर लवकरात लवकर निघून जाईन म्हणत केले सूचक वक्तव्य

VIDEO : मंत्री छगन भुजबळांना शिवसेना आमदार भिडला, भर बैठकीत कॅमेऱ्यासमोर खडाजंगी, हमरीतुमरी!

(chandrashekhar bawankule criticizes maharashtra government on street light and electricity bill of villages)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.