भडकावू स्टेटमेंट देऊन काही नेत्यांचा… संभाजीनगरातील राड्यावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया काय?

संभाजी नगरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संभाजीनगरात आता शांतता आहे. सर्वांनीच शांतता राखावी. अफवांवर विश्वास ठेवू नये असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

भडकावू स्टेटमेंट देऊन काही नेत्यांचा... संभाजीनगरातील राड्यावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया काय?
devendra fadnavisImage Credit source: ani
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 12:58 PM

नागपूर : संभाजीनगरमध्ये काल रात्री दोन गटात तुफान हाणामारी झाली. दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार दगडफेक केली. जाळपोळ करण्यात आली. पोलिसांच्या वाहनांसह 20 वाहनांना आगी लावण्यात आल्या. या राड्यानंतर शहरात तणावपूर्ण शांतता आहे. नाक्यानाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रमजान महिना सुरू आहे. आज रामनवमी आहे. त्यामुळे शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संभाजीनगरातील लोकांना शांत राहण्याचं आणि सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच काही राजकीय लोक आपल्या स्वार्थासाठी उलटसुलट विधाने करत आहेत. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असं आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

संभाजीनगरची घटना दुर्देवी आहे. तिथे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भडकावू स्टेटमेंट देऊन परिस्थिती चिघळवण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. अशा परिस्थितीतमध्ये नेत्यांनी कसं वागलं पाहिजे हे समजून घेण्याची अवश्यकता आहे. कोणी चुकीची स्टेटमेंट देत असतील तर ती देऊ नये. सर्वांनी शांतात पाळावी. आपलं शहर शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. याला कोणी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर यापेक्षा दुर्देव काहीच नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे सुद्धा वाचा

एकमेकांसमोर येऊ नका

अशा प्रकारचे स्टेटमेंट देणं हे कोत्या मनाचं लक्षण आहे. आता संभाजीनगरात शांतता आहे. हीच शांतता राहिली पाहिजे. असा प्रयत्न सर्वांनाच करावा लागेल. काही नेते स्वत:च्या स्वार्थासाठी तिथली राजकीय परिस्थिती बिघडली पाहिजे असा प्रयत्न करत आहेत. तो त्यांनी तात्काळ बंद करावा. सर्वांना विनंती आहे की सर्वांनी शांततेने कार्यक्रम पार पाडावा. कुणीही एकमेकांच्या समोर येऊ नये, असं आवाहन फडणवीस यांनी केलं आहे.

त्यांना कोर्टाची कारवाई समजत नाही

यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या नपुंसक या शेऱ्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. असं कोणतंही निरीक्षण केलेलं नाही. महाराष्ट्र सरकारने काय काय कारवाई केली हे दाखवल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राविरोधात कारवाई केली नाही. कंटेम्प्ट केला नाही. इतर राज्यात काय काय होतं आणि फक्त महाराष्ट्रालाच कसं फोकस केलं जातं हे सरन्यायाधीशांनी दाखवून दिलं आहे. जाणीवपूर्वक कोर्टाचं कुठलं तरी वाक्य काढून बोललं जात आहे. या लोकांना न्यायालयाची कारवाई समजत नाही, अशी टीका त्यांनी केली.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.