AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“एकनाथ शिंदेच 2029 पर्यंत मुख्यमंत्री राहतील”; मुख्यमंत्री पदाच्या वादावर या मंत्र्याने थेट पडदाच पाडला

केंद्राच्या मदतीने राज्यात सन्मान योजनाही करता आली. त्याच बरोबर या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये कृषी विभागाला झुकते माफ देऊन राज्यातील शेतकऱ्याला सुख समाधान देण्याचा प्रयत्न केला गेला असंही त्यांनी यावेळी सांगितले.

एकनाथ शिंदेच 2029 पर्यंत मुख्यमंत्री राहतील; मुख्यमंत्री पदाच्या वादावर या मंत्र्याने थेट पडदाच पाडला
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Apr 27, 2023 | 8:52 PM
Share

नागपूर : एकनाथ शिंदे ज्या दिवसांपासून मुख्यमंत्री पदावर आले आहेत, त्यादिवसांपासून राज्यातील जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लागले आहेत. माझ्यासारखा सामान्य कुटुंबातील व्यक्ती मंत्री पदाच्या खुर्चीवर बसला आहे. त्यामुळे यापुढेही मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे हेच असायला पाहिजे असा विश्वास कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला आहे.एकीकडे राज्यात मुख्यमंत्री पदावरून बॅनरबाजी चालू असतानाच दुसरीकडे मात्र मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे हेच 2029 पर्यंत मुख्यमंत्री होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आखून त्यांची अंमलबजावणी करता आली. त्यांच्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर योग्य ती नुकसानभरपाईही शेतकऱ्यांना देण्यात आली असंही अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री असल्यामुळेच राज्यातील जनसामान्यांना न्याय देण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यांच्यामुळे 2024 मधील निवडणुकीतही तेच मुख्यमंत्री राहिले पाहिजे कारण ते मुख्यमंत्री असतील तरच जनसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहेत.

त्याचबरोबर एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री राहिले तर माझ्यासारख्या सामान्य माणसाला मंत्री पदाची अशी खुर्ची मिळते. शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या मदतीने राज्यात वेगवेगळ्या योजना आखता येतात असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, मी कृषीमंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे एक रुपयामध्ये विमा योजना राबवण्यात आली.

केंद्राच्या मदतीने राज्यात सन्मान योजनाही करता आली. त्याच बरोबर या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये कृषी विभागाला झुकते माफ देऊन राज्यातील शेतकऱ्याला सुख समाधान देण्याचा प्रयत्न केला गेला असंही त्यांनी यावेळी सांगितले.

Follow Us
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....