AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“एकनाथ शिंदेच 2029 पर्यंत मुख्यमंत्री राहतील”; मुख्यमंत्री पदाच्या वादावर या मंत्र्याने थेट पडदाच पाडला

केंद्राच्या मदतीने राज्यात सन्मान योजनाही करता आली. त्याच बरोबर या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये कृषी विभागाला झुकते माफ देऊन राज्यातील शेतकऱ्याला सुख समाधान देण्याचा प्रयत्न केला गेला असंही त्यांनी यावेळी सांगितले.

एकनाथ शिंदेच 2029 पर्यंत मुख्यमंत्री राहतील; मुख्यमंत्री पदाच्या वादावर या मंत्र्याने थेट पडदाच पाडला
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Apr 27, 2023 | 8:52 PM
Share

नागपूर : एकनाथ शिंदे ज्या दिवसांपासून मुख्यमंत्री पदावर आले आहेत, त्यादिवसांपासून राज्यातील जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लागले आहेत. माझ्यासारखा सामान्य कुटुंबातील व्यक्ती मंत्री पदाच्या खुर्चीवर बसला आहे. त्यामुळे यापुढेही मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे हेच असायला पाहिजे असा विश्वास कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला आहे.एकीकडे राज्यात मुख्यमंत्री पदावरून बॅनरबाजी चालू असतानाच दुसरीकडे मात्र मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे हेच 2029 पर्यंत मुख्यमंत्री होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आखून त्यांची अंमलबजावणी करता आली. त्यांच्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर योग्य ती नुकसानभरपाईही शेतकऱ्यांना देण्यात आली असंही अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री असल्यामुळेच राज्यातील जनसामान्यांना न्याय देण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यांच्यामुळे 2024 मधील निवडणुकीतही तेच मुख्यमंत्री राहिले पाहिजे कारण ते मुख्यमंत्री असतील तरच जनसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहेत.

त्याचबरोबर एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री राहिले तर माझ्यासारख्या सामान्य माणसाला मंत्री पदाची अशी खुर्ची मिळते. शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या मदतीने राज्यात वेगवेगळ्या योजना आखता येतात असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, मी कृषीमंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे एक रुपयामध्ये विमा योजना राबवण्यात आली.

केंद्राच्या मदतीने राज्यात सन्मान योजनाही करता आली. त्याच बरोबर या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये कृषी विभागाला झुकते माफ देऊन राज्यातील शेतकऱ्याला सुख समाधान देण्याचा प्रयत्न केला गेला असंही त्यांनी यावेळी सांगितले.

Follow Us
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल