AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची अर्धी रक्कम अखर्चित, माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचा आरोप

रणजित पाटील म्हणाले, खाबुगिरीमध्ये हे राज्य सरकार व्यस्त आहे. जनतेसाठी गंभीर नाही. महाविकास आघाडी सरकार दोन वर्षात फेल झालं असा आरोपही त्यांनी केला.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची अर्धी रक्कम अखर्चित, माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचा आरोप
रणजित पाटील
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Nov 25, 2021 | 5:54 PM
Share

नागपूर : मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे 50 टक्के अजूनही पडले आहेत. जवळपास 600 कोटी अखर्चित आहेत. याची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी केली. नागपुरात पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. रणजित पाटील म्हणाले, खाबुगिरीमध्ये हे राज्य सरकार व्यस्त आहे. जनतेसाठी गंभीर नाही. महाविकास आघाडी सरकार दोन वर्षात फेल झालं असा आरोपही त्यांनी केला.

कुणाचे किती शेअर यात सरकार गुंतले

कोरोनाचा मुकाबला करत असताना राज्य सरकारला अपयश आले. जनादेशाच्या विरुद्ध हे महाविकास आघाडी सरकार आलं. कोणाचा किती शेअर असेल यात हे सरकार गुंतून आहे, असा आरोपसुद्धा रणजित पाटील यांनी केला. केंद्रानं कोरोना काळात मदत केली नसती तर परिस्थिती गंभीर झाली असती, असा टोला राज्यसरकारला लगावला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना काळात महाराष्ट्र पालथा घालत होते. पण राज्याचे मुख्यमंत्री मंत्रालयात सुद्धा गेले नाही. घरीच होते, अशी टीकाही त्यांनी केली.

राज्य सरकार अधिवेशनापासून पळ काढते

कोरोनासाठी आलेल्या साहित्यातसुद्धा भ्रष्टाचार झाला आहे. डझनभर मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या कुंडल्या आहेत. अधिवेशनापासून सरकार पळ काढते. नागपुरात होणार अधिवेशनसुद्धा अजून संभ्रमात आहे. सरकारला संसदीय कामापासून पळ काढायचा आहे. जनतेच्या प्रश्नावर उत्तर द्यायच नाही, असंही रजणित पाटील म्हणाले.

परमबिर सिंगांवर कायद्यानुसार कारवाई व्हावी

केंद्रानं डिझेल पेट्रोलवरचे दर कमी केले. मात्र राज्य सरकार कर कमी करायला तयार नाही. परमविरसिंग मुंबईत दाखल झाले असतील तर आता कायदा आहे. त्याला अनुसरून कारवाई होईल. बिझनेस अडवायझरी कमिटी अधिवेशन संदर्भात निर्णय होईल. नागपूर कराराप्रमाणे नागपुरात अधिवेशन व्हायला पाहिजे. विदर्भातील प्रश्न मार्गी लागायला पाहिजे. महापालिका निवडणुका कोरोनामुळं पुढं ढकलली जात असेल त्याला माझा किंवा पक्षाचा विरोध नसेल. आरोग्य आधी महत्वाचं आहे, असंही रणजित पाटील यांनी सांगितलं.

राज्य सरकार रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटसुद्धा लावू शकलं नाही. हे नियोजन शून्य सरकार आहे. ऑक्सिजन प्लांटची काय अवस्था अतिशय वाईट आहे. 50 टक्केच प्लांट उभे आहेत. प्रत्येक हॉस्पिटलचं ऑडिट केलं गेलं पाहिजे, अशी मागणीही रणजित पाटील यांनी केली.

महिलेसोबत तलाठी कार्यालयातच अश्लील चाळे, तलाठ्याने मित्रांनाही बोलावले, गावकऱ्यांनी दिला चोप

नागपुरात सोन्याच्या भावात घट, जाणून घ्या आजचे सोन्याचांदीचे भाव

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक