AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची अर्धी रक्कम अखर्चित, माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचा आरोप

रणजित पाटील म्हणाले, खाबुगिरीमध्ये हे राज्य सरकार व्यस्त आहे. जनतेसाठी गंभीर नाही. महाविकास आघाडी सरकार दोन वर्षात फेल झालं असा आरोपही त्यांनी केला.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची अर्धी रक्कम अखर्चित, माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचा आरोप
रणजित पाटील
| Edited By: | Updated on: Nov 25, 2021 | 5:54 PM
Share

नागपूर : मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे 50 टक्के अजूनही पडले आहेत. जवळपास 600 कोटी अखर्चित आहेत. याची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी केली. नागपुरात पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. रणजित पाटील म्हणाले, खाबुगिरीमध्ये हे राज्य सरकार व्यस्त आहे. जनतेसाठी गंभीर नाही. महाविकास आघाडी सरकार दोन वर्षात फेल झालं असा आरोपही त्यांनी केला.

कुणाचे किती शेअर यात सरकार गुंतले

कोरोनाचा मुकाबला करत असताना राज्य सरकारला अपयश आले. जनादेशाच्या विरुद्ध हे महाविकास आघाडी सरकार आलं. कोणाचा किती शेअर असेल यात हे सरकार गुंतून आहे, असा आरोपसुद्धा रणजित पाटील यांनी केला. केंद्रानं कोरोना काळात मदत केली नसती तर परिस्थिती गंभीर झाली असती, असा टोला राज्यसरकारला लगावला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना काळात महाराष्ट्र पालथा घालत होते. पण राज्याचे मुख्यमंत्री मंत्रालयात सुद्धा गेले नाही. घरीच होते, अशी टीकाही त्यांनी केली.

राज्य सरकार अधिवेशनापासून पळ काढते

कोरोनासाठी आलेल्या साहित्यातसुद्धा भ्रष्टाचार झाला आहे. डझनभर मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या कुंडल्या आहेत. अधिवेशनापासून सरकार पळ काढते. नागपुरात होणार अधिवेशनसुद्धा अजून संभ्रमात आहे. सरकारला संसदीय कामापासून पळ काढायचा आहे. जनतेच्या प्रश्नावर उत्तर द्यायच नाही, असंही रजणित पाटील म्हणाले.

परमबिर सिंगांवर कायद्यानुसार कारवाई व्हावी

केंद्रानं डिझेल पेट्रोलवरचे दर कमी केले. मात्र राज्य सरकार कर कमी करायला तयार नाही. परमविरसिंग मुंबईत दाखल झाले असतील तर आता कायदा आहे. त्याला अनुसरून कारवाई होईल. बिझनेस अडवायझरी कमिटी अधिवेशन संदर्भात निर्णय होईल. नागपूर कराराप्रमाणे नागपुरात अधिवेशन व्हायला पाहिजे. विदर्भातील प्रश्न मार्गी लागायला पाहिजे. महापालिका निवडणुका कोरोनामुळं पुढं ढकलली जात असेल त्याला माझा किंवा पक्षाचा विरोध नसेल. आरोग्य आधी महत्वाचं आहे, असंही रणजित पाटील यांनी सांगितलं.

राज्य सरकार रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटसुद्धा लावू शकलं नाही. हे नियोजन शून्य सरकार आहे. ऑक्सिजन प्लांटची काय अवस्था अतिशय वाईट आहे. 50 टक्केच प्लांट उभे आहेत. प्रत्येक हॉस्पिटलचं ऑडिट केलं गेलं पाहिजे, अशी मागणीही रणजित पाटील यांनी केली.

महिलेसोबत तलाठी कार्यालयातच अश्लील चाळे, तलाठ्याने मित्रांनाही बोलावले, गावकऱ्यांनी दिला चोप

नागपुरात सोन्याच्या भावात घट, जाणून घ्या आजचे सोन्याचांदीचे भाव

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.