AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूर जिल्ह्यात 70 टक्के लोकांनी घेतले लसीकरणाचे दोन्ही डोस, तरीही गेल्या 24 तासांत 5 मृत्यू, आणखी कोरोना अपडेट काय?

राज्य सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार लशींचा दुसरा डोस टक्केवारी 70 टक्के पूर्ण करणारा जिल्हा परिशिष्ट ‘अ’मध्ये येत आहे. निर्बंध शिथिल करण्यात येतात. त्यासाठी नागपूर जिल्ह्याचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय.

नागपूर जिल्ह्यात 70 टक्के लोकांनी घेतले लसीकरणाचे दोन्ही डोस, तरीही गेल्या 24 तासांत 5 मृत्यू, आणखी कोरोना अपडेट काय?
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Feb 11, 2022 | 2:27 PM
Share

नागपूर : जिल्ह्यात लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 70 टक्के पूर्ण झालीय. त्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात यावे, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांना (Relief and Rehabilitation Department) पाठविलाय. हा प्रस्ताव मान्य झाल्यास नागपूर जिल्ह्यातील वेळेची बंधने हटणार आहेत. राज्य सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार लशींचा दुसरा डोस टक्केवारी 70 टक्के पूर्ण करणारा जिल्हा परिशिष्ट ‘अ’मध्ये येत आहे. निर्बंध शिथिल करण्यात येतात. त्यासाठी नागपूर जिल्ह्याचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय. नागपूर शहर आणि ग्रामीण मिळून लसीकरणाची टक्केवारी पहिला डोस घेणारे 99 टक्के आणि दुसरा डोस घेणारे 70 टक्के झालेय. त्यासोबतंच कोरोना बाधितांची संख्या घटत असल्याने जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी (Positivity) दर 7 टक्क्यांपेक्षा खाली आलाय. त्यामुळे जिल्हाधिकारी आर विमला (Collector R Vimala) यांनी निर्बंध शिथिल करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. येत्या सोमवारपासून नागपुरातील निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे.

गेल्या चोवीस तासात पाच बळी

गुरुवारी शहरातून 1 हजार 526, ग्रामीणमधून 771 व जिल्ह्याबाहेरील 21 असे 2318 जण ठणठणीत बरे झाले. जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या 5 लाख 54 हजार 806 वर गेली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.54 टक्क्यांवर आले आहे. बाधितांची संख्या घटत आहे. कोरोनामुळे दगावणार्‍यांच्या संख्येत चढ-उतार कायमच आहे. गुरुवारी शहरातील तीन व जिल्ह्याबाहेरील दोन अशा पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या 10 हजार 310 वर गेली आहे. तर दिवसभरात जिल्ह्यात 8293 चाचण्या करण्यात आल्यात. त्यापैकी 6.63 टक्के म्हणजेच 549 जणांचे अहवाल सकारात्मक आढळले.

जिल्ह्यात 82 ओमिक्रॉन बाधितांची संख्या वाढली

शहरात 5 हजार 96, ग्रामीणमध्ये 4 हजार 89 व जिल्ह्याबाहेरील 415 असे 9 हजार 600 सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी 89.67 टक्के म्हणजेच 8 हजार 608 जणांना लक्षणेच नसल्याने ते गृहविलगीकरणात आहेत. ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटने बाधितांची संख्या जिल्ह्यात वाढली. गुरुवारी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडून 82 जणांचे अहवाल ओमिक्रॉन सकारात्मक आढळले. यातील बहुतांशी रुग्ण ठणठणीत बरे झालेत.

गोंदियात धावती ट्रेन पकडता पकडता तोल सुटला; महिला पडणार एवढ्यात जवान आला मदतीला धावून…

Nagpur NMC | मनपाच्या स्थायी समितीकडून यंदाही करवाढ नाही, प्रस्ताव मंजुरीसाठी सभागृहाकडे पाठविला

Nagpur Crime | एकटी पाहून मध्यरात्री घरात घुसले; चाकूच्या धाकावर 58 वर्षीय महिलेवर दोघांकडून बलात्कार, नागपुरात चाललंय काय?

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.