AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिमिक्री करून मुख्यमंत्री होता येत नाही; जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना डिवचले

आमच्या पक्षात कुणाला कार्याध्यक्ष करायचं हे आमचा पक्ष बघेल. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या पक्षातील बघावं. अजित दादा नाराज नाहीत. सामनाला कुठले दगड दिसतात माहीत नाही. दादांना महाराष्ट्रात काम करण्याची आवड आहे.

मिमिक्री करून मुख्यमंत्री होता येत नाही; जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना डिवचले
jitendra awhadImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 14, 2023 | 12:02 PM
Share

नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मनसे कार्यकर्त्यांनी दादरमध्ये बॅनरबाजी केली आहे. या बॅनर्सवर राज ठाकरे यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना डिवचले आहे. राज ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले. त्यांना शुभेच्छा. आता त्यांच्याकडे एकच आमदार आहे. हा आकडा 50 पर्यॅत न्यावा लागेल. नुसत्या नकला काढून होणार नाही, असा चिमटा जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना काढला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टोलेबाजी केली.

शिंदे गटाच्या कालच्या जाहिरातीतून बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो गायब होता. त्यावरूनही जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे गटाला टोले लगावले. आजची जाहिरात सरड्याच्या रंगासारखी आहे. आज उद्या ते पंतप्रधान व्हायची इच्छा असल्याचंही बोलतील. आजच्या जाहिरातीतील सर्वेत बदल झाला नाही ना? 24 तासांत सर्वेही बदल करतील ते महान आहेत. या जाहिरातीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांना कळलं असेल. मुख्यमंत्री फार घाईत असतात. मातेश्रीवर असताना त्यांनी सर्वांचे पत्ते साफ केले होते, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

एवढे पैसे आणतात कुठून?

जाहिरातींवर दोन दिवसांत 10 कोटींची खर्च झाला आहे. एवढे पैसे आणतात कुठून? ज्यांनी बोटाला धरुन त्यांना या पदावर बसवलं, त्यांची ही अवेहलना आहे. विधानसभेत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यांना सांभाळून घेतात. त्यांना अशी वागणूक देणार असाल तर ठेच पोहोचते. काहीही म्हटलं तरी फडणवीस मोठे नेते आहेत, असं सांगतानाच 40 आमदारांचं काय प्रेशर आहे, हे मंत्रालयातील सचिवांना विचारा. ते कुणाच्या बदल्या मागतात हे पाहा, असंही ते म्हणाले.

भावनिक खेळ बंद करा

आनंद दिघेंचा मृत्यू एका कारणाने झाला. भावनिक खेळ बंद करा. ठाण्यात दिघेंचं नाव चालतं, त्यामुळे हे आरोप होत असतात. मिनाक्षी शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनीच महापौर केलं होतं, असंही त्यांनी सांगितलं.

सत्तार राजीनामा देणार नाहीत

अब्दूल सत्तार धीट आहेत. ते कुणाच्या बापाचं ऐकत नाही. ते राजीनामा देणार नाही, असं एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले. मुख्यमंत्री हे राक्षसी महत्त्वाकांशा असलेले आहेत. मी किती मोठा आहे हे ते कायमचं दाखवत असतात, अशी टीका त्यांनी केली.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.