AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ravi Rana | महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचं विघ्न, रवी राणा यांची टीका, नवनीत राणा म्हणतात, शनी दूर झाली पाहिजे

राज्याची जनता मुख्यमंत्र्यांकडून त्रस्त आहे. यासाठी आम्ही शनी मंदिरात जाऊन प्रार्थना करणार आहोत. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचं विघ्न आहे. हे दूर झालं पाहिजे. महाराष्ट्रात शांती, सुव्यवस्था नांदली पाहिजे, अशी प्रार्थना देवाला आम्ही करणार आहोत, अशी माहिती रवी राणा यांनी विमानतळावर माध्यमांशी बोलताना दिली.

Ravi Rana | महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचं विघ्न, रवी राणा यांची टीका, नवनीत राणा म्हणतात, शनी दूर झाली पाहिजे
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचं विघ्न, रवी राणा यांची टीका
Reporter Sandeep Rajgolkar
Reporter Sandeep Rajgolkar | Edited By: Govinda Hatwar | Updated on: May 28, 2022 | 2:27 PM
Share

नागपूर : खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) पावणे एक वाजता दाखल झाले. पोलिसांनी विमानतळावर राणा दाम्पत्यांशी चर्चा केली. त्यानंतर नवनीत राणा, रवी राणा यांचं नागपूर येथे स्वागत करण्यात आले. रवी राणा यांना हनुमानाची गदा (Hanuman’s Gada) भेट देण्यात आली. रवी राणा म्हणाले, हनुमान चालिसा वाचणं ही आमच्या हिंदूंची संस्कृती आहे. इतका पोलीस बंदोबस्त. इतका दबाव. मला वाटतं, महाराष्ट्रामध्ये हनुमानाचं नाव घेईल त्याला जेलमध्ये टाकण्याचा एकसुत्री कार्यक्रम सुरू आहे. येणाऱ्या काळात रामभक्त, हनुमान भक्त (Ram Bhakt, Hanuman Bhakt) राज्य सरकारला धडा शिकवेल. कारण या महाराष्ट्राच्या पूर्ण संस्कृतीला बुडविण्याचं काम राज्य सरकारनं केलंय. रामनगरमधील या हनुमान मंदिरात आम्ही अजून प्रार्थना करणार आहोत.

मुख्यमंत्र्यांचा अडीच वर्षात विदर्भात पाय नाही

रवी राणा म्हणाले, उद्धव ठाकरेंचं संकट महाराष्ट्रावर आलेलं आहे. याठिकाणी शेतकरी त्रस्त आहे. बेरोजगारी वाढली आहे. भारनियमन आहे. मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. विदर्भात मुख्यमंत्र्यांनी गेल्या अडीच वर्षात पाय ठेवला नाही. मंत्रालयात पाय ठेवला नाही. अशा परिस्थितीत राज्याची जनता मुख्यमंत्र्यांकडून त्रस्त आहे. यासाठी आम्ही शनी मंदिरात जाऊन प्रार्थना करणार आहोत. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचं विघ्न आहे. हे दूर झालं पाहिजे. महाराष्ट्रात शांती, सुव्यवस्था नांदली पाहिजे, अशी प्रार्थना देवाला आम्ही करणार आहोत, अशी माहिती रवी राणा यांनी विमानतळावर माध्यमांशी बोलताना दिली.

महाराष्ट्राची शनी दूर झाली पाहिजे

नवनीत राणा म्हणाल्या, दिल्लीत आम्ही रॅली काढली. पूजन केलं. तिथं सुरक्षा खूप होती. मंदिरात आम्ही हनुमान चालिसा वाचलं. तिथं आरती केली. तिथं काहीही त्रास झाला नाही. पण, महाराष्ट्रात हनुमान चालिसाचा विरोध का, रामाचा विरोध का, असा सवाल नवनीत राणा यांनी केला. आमचे राम भक्त, हनुमान भक्त ठिकठिकाणी पोहचले. आता आम्ही नागपुरातील रामनगर येथील हनुमान मंदिरात महाराष्ट्राची शनी दूर झाली पाहिजे, यासाठी हनुमान चालिसा पठण करत आहोत.

Follow Us
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य
रायगडला नवा पालकमंत्री. गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव...
रायगडला नवा पालकमंत्री. गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला,पालकमंत्रीपदी गोगावले, महाजन यांची नियुक्ती
रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले, नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट...
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट याचिकाकर्त्यांनाच नोटीस; ED, CBI...
दिमागी नक्षलवाद: सोशल मीडियावर नवीन ट्रेंड, लाखोंनी केले फॉलो
दिमागी नक्षल पार्टीचा सोशल मीडियावर धुमाकूळ: पंतप्रधानांच्या शब्दातून झालेली ऑनलाईन चळवळ
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना दिले तातडीचे निर्देश... झारखंड विद्यार्थी
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना दिले तातडीचे निर्देश... झारखंड विद्यार्थी आंदोलनावर अखेर राहुल गांधींनी सोडलं मौन
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानांच्या भेटीत...
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानांच्या भेटीत नेमकं काय घडलं? मोठी अपडेट समोर