Ravi Rana | महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचं विघ्न, रवी राणा यांची टीका, नवनीत राणा म्हणतात, शनी दूर झाली पाहिजे

राज्याची जनता मुख्यमंत्र्यांकडून त्रस्त आहे. यासाठी आम्ही शनी मंदिरात जाऊन प्रार्थना करणार आहोत. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचं विघ्न आहे. हे दूर झालं पाहिजे. महाराष्ट्रात शांती, सुव्यवस्था नांदली पाहिजे, अशी प्रार्थना देवाला आम्ही करणार आहोत, अशी माहिती रवी राणा यांनी विमानतळावर माध्यमांशी बोलताना दिली.

Ravi Rana | महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचं विघ्न, रवी राणा यांची टीका, नवनीत राणा म्हणतात, शनी दूर झाली पाहिजे
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचं विघ्न, रवी राणा यांची टीका
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 2:27 PM

नागपूर : खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) पावणे एक वाजता दाखल झाले. पोलिसांनी विमानतळावर राणा दाम्पत्यांशी चर्चा केली. त्यानंतर नवनीत राणा, रवी राणा यांचं नागपूर येथे स्वागत करण्यात आले. रवी राणा यांना हनुमानाची गदा (Hanuman’s Gada) भेट देण्यात आली. रवी राणा म्हणाले, हनुमान चालिसा वाचणं ही आमच्या हिंदूंची संस्कृती आहे. इतका पोलीस बंदोबस्त. इतका दबाव. मला वाटतं, महाराष्ट्रामध्ये हनुमानाचं नाव घेईल त्याला जेलमध्ये टाकण्याचा एकसुत्री कार्यक्रम सुरू आहे. येणाऱ्या काळात रामभक्त, हनुमान भक्त (Ram Bhakt, Hanuman Bhakt) राज्य सरकारला धडा शिकवेल. कारण या महाराष्ट्राच्या पूर्ण संस्कृतीला बुडविण्याचं काम राज्य सरकारनं केलंय. रामनगरमधील या हनुमान मंदिरात आम्ही अजून प्रार्थना करणार आहोत.

मुख्यमंत्र्यांचा अडीच वर्षात विदर्भात पाय नाही

रवी राणा म्हणाले, उद्धव ठाकरेंचं संकट महाराष्ट्रावर आलेलं आहे. याठिकाणी शेतकरी त्रस्त आहे. बेरोजगारी वाढली आहे. भारनियमन आहे. मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. विदर्भात मुख्यमंत्र्यांनी गेल्या अडीच वर्षात पाय ठेवला नाही. मंत्रालयात पाय ठेवला नाही. अशा परिस्थितीत राज्याची जनता मुख्यमंत्र्यांकडून त्रस्त आहे. यासाठी आम्ही शनी मंदिरात जाऊन प्रार्थना करणार आहोत. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचं विघ्न आहे. हे दूर झालं पाहिजे. महाराष्ट्रात शांती, सुव्यवस्था नांदली पाहिजे, अशी प्रार्थना देवाला आम्ही करणार आहोत, अशी माहिती रवी राणा यांनी विमानतळावर माध्यमांशी बोलताना दिली.

महाराष्ट्राची शनी दूर झाली पाहिजे

नवनीत राणा म्हणाल्या, दिल्लीत आम्ही रॅली काढली. पूजन केलं. तिथं सुरक्षा खूप होती. मंदिरात आम्ही हनुमान चालिसा वाचलं. तिथं आरती केली. तिथं काहीही त्रास झाला नाही. पण, महाराष्ट्रात हनुमान चालिसाचा विरोध का, रामाचा विरोध का, असा सवाल नवनीत राणा यांनी केला. आमचे राम भक्त, हनुमान भक्त ठिकठिकाणी पोहचले. आता आम्ही नागपुरातील रामनगर येथील हनुमान मंदिरात महाराष्ट्राची शनी दूर झाली पाहिजे, यासाठी हनुमान चालिसा पठण करत आहोत.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.