AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस तात्काळ राजीनामा द्या; नाना पटोले यांची मागणी कशासाठी?

हे प्रकरण कोर्टात गेलं. त्यावेळी ही केस थांबवता येणार नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलं. त्यामुळे आज आम्ही विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीस तात्काळ राजीनामा द्या; नाना पटोले यांची मागणी कशासाठी?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 22, 2022 | 12:20 PM
Share

नागपूर: रश्मी शुक्ला प्रकरणावरून विरोधकांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच घेरलं आहे. रश्मी शुक्ला यांना सरकारने क्लीनचीट दिलं. पण कोर्टाने या प्रकरणी सरकारला धारेवर धरलं आहे. त्यामुळे शुक्ला यांना क्लीनचिट देणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली आहे.

फोन टॅपिंग आदेशाने चालले होते का? काही पत्रकारांचे फोन टॅपिंग झाले होते का? रश्मी शुक्ला यांच्याबाबत काही प्रतिक्रिया आल्या आणि त्या दोषी आढळल्या. सरकार बदललं आणि त्यांना क्लिीनचिट दिली. पण सरकारला कोर्टाने धारेवर धरले आहे. आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. तेव्हा पत्रकार, राजकीय लोकांचे आणि अधिकाऱ्यांचे फोन टॅप केले जात होते. फोन टॅपिंग करणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे. यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोषी आहेत. त्यामुळे त्यांनी ऑर्डर मागे घेतली. हे दोषी आणि ब्लॅकमेलिंग सरकार आहे, असं सांगतानाच विधानसभा अध्यक्ष सरकारच्या बाजूने चालतात. अध्यक्षाच्या बाबतीत आम्ही अविश्वास ठराव आणू, असंही त्यांनी सांगितलं.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही यावेळी मीडियाशी संवाद साधला. आज 11 वाजता प्रश्नोत्तराचा तास होता. नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी नियम 57 अन्वये या प्रश्नावर चर्चा करावी अशी आम्ही मागणी केली.

देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या गृहविभागातील अधिकारी रश्मी शुक्ला या पुण्यात असताना त्यांनी फोन टॅपिंगला परवानगी दिली. त्यांनी वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांचे फोन टॅप केले. चौकशीत फोन टॅपिंग सिद्ध झालं. चौकशी झाली, गुन्हा दाखल झाला. काही कारणामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकार गेलं आणि शिंदेंचं सरकार आलं. त्यानंतर चौकशी थांबवून त्यांना क्लीनचिट देण्यात आली, असं त्यांनी सांगितलं.

हे प्रकरण कोर्टात गेलं. त्यावेळी ही केस थांबवता येणार नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलं. त्यामुळे आज आम्ही विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला. पण आम्हाला बोलू देत नाही. आम्ही वेगवेगळ्या आयुधाचा वापर करुन बोलण्याची मागणी करतो. पण संधीच देत नाही.

आज माजी अध्याक्षाबद्दल तुम्ही अशी भूमिका घेत असाल तर इतरांना कोण न्याय देणार? आम्ही सर्व विरोधी पक्षाच्या सदस्यांनी निषेध केला आहे आणि सभात्याग केला आहे. ज्यांचा तपास पूर्ण झाला त्यांच्या तपासाचे आदेश काढतायत आणि ज्यांचे तपास सुरु होते त्यांचे बंद केले जातायत, अशी टीका अजित पवार यांनी केली.

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.