AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“…पण सत्तेची नशा देश उद्ध्वस्त करते; वज्रमूठ सभेतून उद्धव ठाकरे यांनी वर्मावरच घाव घातला”

एका माणसाने देशाला घटना दिला, मग एवढी मोठी जनता बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाचवू शकत नाही का असा सवाल करत , ते म्हणाले की, मी घटना बचाव करणार असं म्हणणार नाही तर घटनेचं संरक्षण मीच करणार असं ठणकावूनही त्यांनी यावेळी सांगितले.

...पण सत्तेची नशा देश उद्ध्वस्त करते; वज्रमूठ सभेतून उद्धव ठाकरे यांनी वर्मावरच घाव घातला
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Apr 16, 2023 | 9:05 PM
Share

नागपूर : महाविकास आघाडीला राज्यातील सत्तेतून बाहेर पडावे लागल्यानंतर औरंगाबादनंतर मविआची ही आजची दुसरी सभा होत आहे. महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपूरमध्ये ही सभा होत असल्याने या सभेकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. यावेळी उद्धव ठाकरे बोलताना म्हटले की, यावेळी मला जुने दिवस आठवले, जेव्हा आम्ही एकत्र नव्हतो. त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस, शिवसेना समारोसमोर होते. त्यानंतर महाविकास आघाडी जन्माला आली आणि त्यावेळी आम्ही कर्जमुक्त करुन दाखवलं होतं असंही त्यांनी यावेळी सांगितले.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर आणि शिंदे-फडणवी सरकारवर घणाघात करताना त्यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

यावेळी ते म्हणाले की, अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले ही आनंदाची गोष्ट असली तरी पण हा पुरस्कार कुणाच्या हस्ते देण्यात आला? असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावलया आहे.

महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेसाठी नागरिकांची जमलेली गर्दी पाहून ते म्हणाले की, आज एवढी लोकं जमली आहेत, पण आपल्या देशात आज लोकशाहीचा उपयोग फक्त सत्तेत बसलेल्यांच्या मित्रांचा गिऱ्हाईक आणि सत्ताधाऱ्यांच्या मतदार वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो आहे अशी टीकाही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली.

उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा सादताना आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलताना त्यांनी संविधानावर घाला घालण्याचे काम भाजप करत असल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी केला. यावेळी त्यांनी सांगितले की, ज्या भूमीत बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवलं.

ज्या बाबासाहेबांनी देशाला संविधान दिलं आहे. मात्र त्याच भारताला आता आणि भारत मातेच्या पायात पुन्हा बेड्या घालण्याचं काम भाजपने सुरु केल्याची टीकाही त्यांनी केली.

एका माणसाने देशाला घटना दिला, मग एवढी मोठी जनता बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाचवू शकत नाही का असा सवाल करत , ते म्हणाले की, मी घटना बचाव करणार असं म्हणणार नाही तर घटनेचं संरक्षण मीच करणार असं ठणकावूनही त्यांनी यावेळी सांगितले.

दारुचं व्यसन घर उद्ध्वस्त करतं पण सत्तेची नशा देश उद्ध्वस्त करते असं म्हणते त्यांनी राज्यातील आणि देशातील सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

आपल्या देशात आज लोकशाहीचा उपयोग फक्त सत्तेत बसलेल्यांच्या मित्रांचा गिऱ्हाईक आणि सत्ताधाऱ्यांच्या मतदार वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो असं म्हणत त्यांनी भाजप आणि राज्यातील शिंदे आणि फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Follow Us
ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा
Uday Samant | ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना
Cabinet Meeting Update | मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी मोठी खलबतं!
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील...
Subhash Chandra | सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील NCLTचा आदेश रद्द
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
PM Modi | भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना म्हणाले, निराशा पसरवू नका...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
OBC Morcha | ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात आंदोलक आक्रमक; मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम! 75 वर्षीय आजींच्या धैर्याची कहाणी थक्क करणारी
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत सर्वच महागलं
भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...
Sanjay Raut | भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर घणाघाती हल्ला
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा
फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन्....
Video | फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन् प्रशासकीय छळाच्या आरोपांनी प्रकरणाला नवं वळण!