AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur : नागपूरकरांनो पाणी जपून वापरा, 18 तासांसाठी काही विभागात पाणी पुरवठा बंद

दुरूस्तीचं काम झाल्यानंतर पाणी पुरवठा कमी दाबाने पुरवठा केला जाणार आहे. दोन दिवसांनी पाणी पुरवठा सुरळीत होईल असं पाणी पुरवठा विभागाने सांगितले आहे.

Nagpur : नागपूरकरांनो पाणी जपून वापरा, 18 तासांसाठी काही विभागात पाणी पुरवठा बंद
पाण्याचा जपून वापर कराImage Credit source: twitter
| Edited By: | Updated on: May 29, 2022 | 8:35 AM
Share

नागपूर – महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक जिल्ह्यात पावसाळ्यापुर्वी पाणी पुरवठा विभागाने (Water Supply Department) दुरूस्ती कामे हाती घेतली आहेत. जी कामं अत्यंत महत्त्वाची आहेत अशी काम तात्काळ करण्याचं ठरवलं आहे. तसेच अनेक कामं पावसाळ्यात कर्मचाऱ्यांना करण शक्य होत नाही अशी काम मान्सून पावसापुर्वी केली जात आहेत. नवीन जलकुंभ उभारण्यात आले आहे, त्या जलकुंभाच्या जोडणी करीता मंगळवारी दिवसभर नागपूरात (Nagpur) पाणी पुरवठा पुर्णपणे बंद राहणार आहे. पालिकेकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पत्रकात पालिकेला सहकार्य करावे असं देखील म्हटलं आहे. महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, ठाणे या जिल्ह्यात देखील दुरूस्तीची कामे नुकतीच झाली आहेत.

या परिसरात पाणी पुरवठा पुर्णपणे बंद

धरमपेठ

लक्ष्मीनगर

हनुमान नगर

पाणी पुरवठा मंगळवारी बंद राहणार आहे

नागपुरातील चार झोन मधील जलकुंभाचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद राहणार आहे. त्यामध्ये धरमपेठ ,लक्ष्मीनगर, हनुमान नगर या परिसरात पाणी पुरवठा होणार नाही. दुरूस्तीचं काम झाल्यानंतर पाणी पुरवठा कमी दाबाने पुरवठा केला जाणार आहे. दोन दिवसांनी पाणी पुरवठा सुरळीत होईल असं पाणी पुरवठा विभागाने सांगितले आहे. नवीन जलकुंभ उभारण्यात आले आहे, त्यांच्या जलकुंभाच्या 1200 मी.मी व्यासाच्या जलवाहिनी वर आंतरजोडणी च्या कामासाठी 18 तास पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे.

जुलै अखेरीस पुरेल एवढा पाणी पुरवठा शिल्लक

यंदा लोकांनी महाराष्ट्रात चांगलाच उन्हाळा पाहायला मिळाला. सध्या महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे लोकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या धरणात जुलै अखेरीस पुरेल एवढा पाणी पुरवठा शिल्लक आहे. यंदा सुध्दा चांगल्या पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

त्यामुळे पुढच्यावर्षी देखील पाणी पुरवठ्याची समस्या निर्माण होणार अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन.