AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur | नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा, चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल, जे पक्ष सांभाळू शकत नाही ते निवडणुका कशा लढतील?

नाना पटोले यांनी दिलेला उमेदवार काँग्रेसच्या दोन मंत्र्यांनी बदलला. येवढा कमजोर प्रदेशाध्यक्ष काँग्रेसला आजपर्यंत मिळाला नाही. त्यामुळं काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नाना पटोले यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

Nagpur | नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा, चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल, जे पक्ष सांभाळू शकत नाही ते निवडणुका कशा लढतील?
चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेते
| Edited By: | Updated on: Dec 11, 2021 | 1:39 PM
Share

नागपूर : नाना पटोले हे महाराष्ट्र काँग्रेसचे आतापर्यंतचे सर्वात हतबल प्रदेशाध्यक्ष राहिलेत. दोन मंत्र्यांच्या दबावात त्यांनी नागपूर विधान परिषदेचा उमेदवार काँग्रेसने बदलला. त्यामुळं नाना पटोले यांनी आजच्या आज आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असा हल्लाबोल भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. नागपुरात पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते.

नाना पटोले यांनी दिलेला उमेदवार काँग्रेसच्या दोन मंत्र्यांनी बदलला. येवढा कमजोर प्रदेशाध्यक्ष काँग्रेसला आजपर्यंत मिळाला नाही. त्यामुळं काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नाना पटोले यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

318 पेक्षा जास्त जागा मिळतील

नागपुरातील घडामोडीमुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मनोबल खचलंय. भाजपला १४ डिसेंबरच्या निकालात ३१८ पेक्षा मत महाविकास आघाडीला मिळालेली असतील. असं म्हणतं जे पक्ष सांभाळू शकत नाही, ते निवडणुका काय लढणार, असा टोला नाना पटोले यांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.

प्रस्ताव 405 कोटींचा, दिले पाच कोटी

राज्य सरकारने इम्पेरीकल डाटा गोळा करण्यासाठी दिलेले पाच कोटी अत्यंत तुटपुंजा निधी आहे. 405 कोटींचा प्रस्ताव असताना 5 कोटी रुपये देणे ही शरमेची बाब आहे. अनेक ओबीसी मंत्री असताना इम्पेरीकल डाटा गोळा करायला फक्त 5 कोटी दिले. पाच कोटी रुपयांत काहीही होणार नाही. सरकारने तोंडाला पानं पुसलेत. हे सरकार झोपलंय. काही पोपट खोटं बोलतायत, असा घणाघातही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

निवडणुका पुढे ढकला

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानं भंडाऱ्यात ओबीसी मतदार नाराज आहेत. काहींनी तर घरासमोर पाट्या लावल्यात. हे आरक्षण रद्द झाल्यानं आमच्या घरी मत मागायला येऊ नका, असं मतदारांचं म्हणण आहे. भंडारा येथे मतदारांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. आज आरक्षण देत असल्यानं आजचा डेटा लागेल. यामुळं भंडारा-गोंदियातील निवडणुका पुढे ढकलायला हव्यात. एका महिन्यात डाटा गोळा करणं शक्य आहे. या सरकारला ओबीसी समाजाच्या जागेवर सुभेदार लढवायचे आहेत. त्यामुळं ते ओबीसींचे आरक्षण टिकवू शकले नाहीत, अशी टीकाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

Nagpur Crime | चोरी करून पळाला, प्रेयसीच्या होता संपर्कात; तिने केली पोलिसांना मदत आणि…

Nagpur Congress : काँग्रेस मंत्र्यांच्या दबाव, उमदेवार बदलणं हा नाना पटोलेंना दणका? नागपुरात चर्चा

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.