AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्नाटकचे संसदीय मंत्री म्हणतात, मुंबई आमची, सुनील राऊत यांची प्रतिक्रिया काय?

सुनील राऊत यांनी सांगितलं की, शिवसेना एकच आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. बाकी कुठंलीही शिवसेना आम्हाला माहिती नाही.

कर्नाटकचे संसदीय मंत्री म्हणतात, मुंबई आमची, सुनील राऊत यांची प्रतिक्रिया काय?
सुनील राऊत
| Edited By: | Updated on: Dec 28, 2022 | 4:57 PM
Share

नागपूर : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि मंत्री वक्तव्य करत आहेत. संसदीय मंत्री मधू स्वामी यांनी मुंबई आमची असा दावा केला आहे. त्यावर बोलताना भांडुपचे आमदार सुनील राऊत म्हणाले, कर्नाटकात काय दावा केला. याला मुंबईत, महाराष्ट्रात किंमत दिली जाणार नाही. १०५ हुतात्मे घेऊन मुंबई मिळवलेली आहे. या मुंबईवर फक्त मराठी माणसाचाच हक्क आहे. मुंबई फक्त मराठी माणसाचीच आहे, असं वक्तव्य सुनील राऊत यांनी केलं. कोणी काय दावे केले याला आम्ही शून्य किंमत देतो

मुंबईत २० टक्के कानडी भाषिक आहेत. त्यामुळं मुंबई आमची असल्याचा दावा कर्नाटकचे मंत्री करतात. महाराष्ट्राच्या विधानभवनात सीमावादावर ठराव घेण्यात आला. तरीही कर्नाटकचे मंत्री शांत बसण्याचे नाव घेत नाहीत. त्यावर बोलताना सुनील राऊत म्हणाले,  महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना ते किंमती देत नाहीत. आधीचं केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या बैठका झाल्या. तिथं झाल्याल्या ठरावांचं पालन केलं गेलं पाहिजे. कुणीही विनाकारण काही बोलू नये.

उद्धव ठाकरे यांनी बेळगाव केंद्रशासित करण्याची मागणी केली होती. त्यावर आता कर्नाटकी मंत्री हे मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी करत आहेत. त्यावर बोलताना सुनील राऊत यांनी सांगितलं की, बेळगावात मराठी माणसांची मुस्कटदाबी होत आहे. मराठी माणसांवर अन्याय अत्याचार केला जात आहे. बेळगावच्या मागणीला ७० वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबई मराठी माणसाच्या बापाची असल्याचं कर्नाटकला सांगावं लागेल.

सुनील राऊत  यांनी सांगितलं की, शिवसेना एकच आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. बाकी कुठंलीही शिवसेना आम्हाला माहिती नाही. उद्धव ठाकरे, संजय राऊत हे अजूनही नागपुरात आहेत. ते बाँबस्फोट करतील. रोज काहीतरी होत आहे. एकदा टाईम बाँब लावला जाईल. चिंता करू नका.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...