AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yavatmal Pollution | वणीत प्रदूषणाचा धोका कायम; उपाययोजना करण्यासाठी भाजप नेते सरसावलेत

कोल वॅाशरीज, गिट्टी क्रशर, सिमेंट प्लांट, कोल वाहतूक यामुळं प्रदूषण वाढलंय. त्यामुळं वणी तालुक्यात एअर क्वॅालेटी मॅानिटरिंग स्टेशन बसवावं, अशी मागणी भाजपच्या वतीनं करण्यात आलीय.

Yavatmal Pollution | वणीत प्रदूषणाचा धोका कायम; उपाययोजना करण्यासाठी भाजप नेते सरसावलेत
वणीत कोळसा वाहतुकीमुळं अशाप्रकारे प्रदूषण होत आहे.
| Edited By: | Updated on: Dec 16, 2021 | 5:57 AM
Share

यवतमाळ : जिल्ह्यातील वणी शहरात वायू प्रदूषणाची मोठी समस्या आहे. वाढत्या प्रदूषणामुळं लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. टीव्ही 9 मराठीने दाखवलेल्या या बातमीची दखल घेत, प्रदूषणाबाबत उपाययोजना कराव्यात यासाठी भाजपचे स्थानिक नेते विजय पिदूरकर यांनी वणी एसडीओ यांना निवेदन दिलंय.

कोल वॅाशरीज, गिट्टी क्रशर, सिमेंट प्लांट, कोल वाहतूक यामुळं प्रदूषण वाढलंय. त्यामुळं वणी तालुक्यात एअर क्वॅालेटी मॅानिटरिंग स्टेशन बसवावं, अशी मागणी भाजपच्या वतीनं करण्यात आलीय. याबबातचं निवेदन त्यांनी एसडीओमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय.

चुरीमुळं पीकं धोक्यात

वणी तालुका कोळसा, सिमेंट, चुनखडी, उतरणी माल भरणे आणि सोडणे यामुळं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. गिट्टी वाहतूक करताना गिट्टीची चुरी रस्त्यावर आणि बाजूच्या शेतात उडते. त्यामुळं पीकं धोक्यात आली आहेत. हीच चुरी लोकांच्या अंगावर उडाल्यामुळं ध्वनी प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे.

अस्थमा, श्वसनाचे आजार वाढले

सॅटेलाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार, 50 पर्यंत गुणवत्ता असेल, तर ते वायू चांगले आहे. 50 आणि 100 च्या मधात असेल तर ते समाधानकारण आहे. परंतु, 100 च्या वर असेल तर ते आरोग्यास घातक आहे. खनिज विकास निधीत यवतमाळ जिल्ह्याचा 90 टक्के वाटा आहे. येथील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. अस्थमा, श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात झाले आहेत. त्वचारोग, चिडचिडेपणा यासारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागते. चुरी डोळ्यात गेल्यानं डोळ्यांचे आजार झाले आहेत. गाड्यांच्या कर्णकर्कश आवाजानं बहिरेपणासारखी समस्या उभी ठाकली आहे. तरीही खाण बाधित क्षेत्रात 25 टक्केसुद्धा निधी खर्च केला जात नाही.

मुकी जनावरे पडतात बळी

माणूसच नव्हे तर जनावरेही या आजाराला बळी पडत आहेत. ते धूळमिश्रित गवत खात आहेत. शेततळ्यातल्या आणि नाल्यातल्या पाण्यावर धूळ साचली आहे. ते धूळमिश्रित पाणी पिणेही जनावरांसाठी धोकादायक आहे. धुळयुक्त विषारी पाणी पिऊन जनावरे धोकादायक स्थितीत आली आहेत.

एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन बसवावे

ही परिस्थिती लक्षात घेता वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यातून प्रमुख खनिज म्हणून वायूची गुणवत्ता दाखविणारं स्टेशन आवश्यक आहे. ते अद्याप वणी तालुक्यात बसविलेलं नाही. ते बसविल्यास नेमके किती आणि कसे प्रदूषण होते, हे स्पष्ट होईल. एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन बसवावं, अशी मागणी एसडीओंमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.

इतर बातम्या 

Nagpur | 80 वर्षीय आजीची कर्करोगाशी झुंज, पाच मुलांनी सोडले वाऱ्यावर?; नातू करतो सेवा!

Nagpur Crime | सात दरोडेखोर तलवारीसह घरात घुसले, गळ्याला चाकू लावला नि सोनं लुटलं!

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.