AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकाच घरात दोन-तीन पक्षांची मंडळी आहेत, नाना पाटेकर यांची टीका

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या बायकोला चेक देण्याची वेळ येते. यासारखी दुर्दैवी बाब नाही.

एकाच घरात दोन-तीन पक्षांची मंडळी आहेत, नाना पाटेकर यांची टीका
नाना पाटेकर
| Edited By: | Updated on: Dec 02, 2022 | 8:03 PM
Share

नागपूर – एकाच घरात दोन-तीन पक्षांचे लोकं आहेत. असं असेल तर सोडून द्या राजकारणातून बाहेर पडा, असा सल्ला अभिनेता नाना पाटेकर यांनी दिला. नागपुरात ते बोलत होते. एकमेकांना आपण सांभाळणार आहोत. हे कधी कळणार आपल्याला, असा सवालही त्यांनी केला. पुन्हा पुन्हा त्याच चक्रव्युव्हार का जातोय. एखादा अधिकारी भ्रष्ट अधिकारी असेल. सगळे मिळून का बोलत नाहीत. तो एक असतो. तुम्ही सगळे आहात. सगळे मिळून त्याच्याविरोधात बोला, असंही पाटेकर म्हणाले. एकत्र व्हा. आपल्यामध्येच राज्यकर्त्यांनी आपल्यामध्ये भींती बांधून टाकल्या आहेत. त्या तोडा. मग, हे सर्व सगळं संपेल. धर्म, जात कधी पाहिली नाही. अभिनेता म्हणून माझा चित्रपट पाहिला जातो. आवडला तर बघतात अन्यथा नाही, असंही त्यांनी सांगितलं.

नाना पाटेकर म्हणाले, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या बायकोला चेक देण्याची वेळ येते. यासारखी दुर्दैवी बाब नाही. हा स्वागत समारंभ असू शकत नाही. प्रत्येकानं यामध्ये आपला सहभाग दिला पाहिजे.

मला माझ्या वैयक्तिक पातळीवर शेतकऱ्यांसाठी काय करता येईल. याचा प्रयत्न करतो. सरकार त्यांच्या पातळीवर काम करतं. प्रत्येकवेळी सरकारवर अवलंबून असणं योग्य नाही. आपण काय करू शकतो, हे महत्त्वाचं आहे. कोकण, पुण्यात पाऊस आल्यानंतर सगळ्या मोहोर गळून पडतो. कुठलं पीक घेतलं तर शेतकऱ्याला फायदा होईल, याचा विचार केला पाहिजे. असा प्रयोग केला होता, याची आठवण त्यांनी करून दिली.

शेतकऱ्याला तीन हजारांऐवजी एकरी तीन लाख रुपये मिळाले पाहिजे. शेतकऱ्याला हमी देता आली पाहिजे. शासकीय दृष्टीकोनातून विचार करावा. पुढं येऊन काम करणारी माणसं हवीत.

शेतकऱ्यानी पारंपरिक पद्धतीनं शेती करून नये. पद्धत बदलली पाहिजे. लोकसंख्या वाढली. जमीन तेवढीच आहे. सगळं तेच आहे. माणसं वाढली. पण, आपण सर्व एक दिवस जाणार आहोत. इतिहासात नोंद व्हायला पाहिजे, असं नाही. समाधान नावाची गोष्ट हवी. प्रत्येक गोष्टीला पुरस्कार कशाला हवा, असा टोलाही नाना पाटेकर यांनी लगावला.

Follow Us
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं.
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय....
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....