AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NMC Election | तीन सदस्यीय प्रभागामुळे राष्ट्रवादी अडचणीत; नागपुरात प्रफुल्ल पटेलांना का व्हावे लागले सक्रिय?

राष्ट्रवादी खंबीर नेतृत्वाअभावी शहरात फारसा टिकाव धरू शकला नाही. आता प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांत प्राण फुंकले आहे. दुनेश्वर पेठे हे स्वतः नगरसेवक आहेत. ते काय जादू करतात, हे पाहावे लागेल.

NMC Election | तीन सदस्यीय प्रभागामुळे राष्ट्रवादी अडचणीत; नागपुरात प्रफुल्ल पटेलांना का व्हावे लागले सक्रिय?
नागपूर मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे नेतृत्व करणारे प्रफुल्ल पटेल.
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jan 15, 2022 | 6:04 AM
Share

नागपूर : मनपा निवडणुकीत (NMC Election) स्वबळावर लढणार असल्याचं काँग्रेसनं जाहीर केलं. त्यामुळं राष्ट्रवादीला मनपात एकटे लढण्याची वेळ आली आहे. गेल्या तीन निवडणुकींचा विचार करता राष्ट्रवादीचा परफार्मन्स प्रत्येक वेळ खाली घसरला आहे. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील माजी मंत्री अनिल देशमुख आता जेलमध्ये आहेत. त्यामुळं त्यांची पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादीचे हेविवेट नेते प्रफुल्ल पटेल यांनी नागपूरवर लक्ष केंद्रित केले आहे. मध्यंतरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपुरात सभा घेऊन अनिल देशमुख लवकरच बाहेर येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन काँग्रेस जवळ घेत नसेल, तर स्वबळावर लढण्याची तयारी करा, असे सांगितले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी पक्षाची धुरा सांभाळली आहे. पण, तीन सदस्यीय प्रभाग पद्धती असल्याने घड्याळाचा आलाराम किती वाजणार हे येणारी वेळच ठरवेल.

गेल्या तीन निवडणुकीत राष्ट्रवादीचा ग्राफ घसरतोय

राष्ट्रवादी काँग्रेसला शहरात नेते मिळाले. पण, कार्यकर्ते फारसे मिळाले नाहीत. गेल्या पंधरा वर्षांत राष्ट्रवादीने दोन अंकी आकडा पार केला नाही. २००७ मध्ये नऊ जागा, २०१२ मध्ये सहा जागा, तर २०१७ मध्ये फक्त एका जागेवर राष्ट्रवादीला समाधान मानावे लागले. २०१७ मध्ये मनपा निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने झाली होती. सुमारे ५० ते ६० हजार मतदारांचा एक प्रभाग होता. प्रभागाचा विस्तार मोठा असल्याने छोटे पक्ष फारसे टिकले नाहीत. राष्ट्रवादीने ११० जागांवर निवडणूक लढविली होती. सोबतीला प्रा. जोगेंद्र कवाडे, पीरिपा होते. पण, फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले होते. दुनेश्वर पेठे राष्ट्रवादीचे एकमेव उमेदवार निवडूण आले होते.

नेतृत्त्वानेच सोडली राष्ट्रवादीची साथ

ज्या नेत्यांवर राष्ट्रवादीची धुरा देण्यात आली त्यांनी पक्षाची साथ सोडल्याचे दिसून येते. गिरीश गांधी यांना राष्ट्रवादीचे शहराचे नेतृत्तव दिले होते. त्यांनी पक्षाचे कार्यायल उभारले. नंतर स्वतःला पक्षापासून दूर केले. माजी आमदार अशोक धवड यांनाही नेतृत्तव सोपविण्यात आले होते. पण, त्यांनी घड्याळाची साथ सोडून काँग्रेसचा हात धरला. त्यानंतर अजय पाटील आले. पण, त्यांची पत्नी प्रगती पाटील या अध्यक्ष भाजपकडून महापालिकेची निवडणूक लढल्या. त्यामुळं राष्ट्रवादी खंबीर नेतृत्वाअभावी शहरात फारसा टिकाव धरू शकला नाही. आता प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांत प्राण फुंकले आहे. दुनेश्वर पेठे हे स्वतः नगरसेवक आहेत. ते काय जादू करतात, हे पाहावे लागेल.

Nagpur Crime | प्रेयसीसाठी चोर बनलेला पोलिसांना धक्का मारून पळाला; जंगलात कसे केले सर्च ऑपरेशन?

Nagpur RTO | वाहन नोंदणी व नूतनीकरणाचे नवीन दर 1 एप्रिल लागू होणार, जाणून घ्या नवे दर

Nagpur School | सरसकट शाळाबंदीच्या निर्णयाला विरोध, शिक्षणाची जिम्मेदारी घेणार कोण ?, प्रा. सचिन काळबांडे म्हणतात…

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली