AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नंदुरबारमधून 40 हजार कुटुंबांसह हजारो बालकांचं स्थलांतर, मुलांसाठी आलेल्या पोषण आहाराचं काय होतं?

नंदुरबारमधून 40 हजार कुटुंबांनी रोजगारासाठी स्थलांतर केल्यानं त्यांच्या सोबत जाणाऱ्या मुलांना पोषण आहार कसा मिळणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. ( Nandurbar Migration Nutrition Food )

नंदुरबारमधून 40 हजार कुटुंबांसह हजारो बालकांचं स्थलांतर, मुलांसाठी आलेल्या पोषण आहाराचं काय होतं?
स्थलांतरित बालकांच्या पोषण आहाराचा प्रश्न निर्माण झालाय
| Updated on: Jan 24, 2021 | 1:46 PM
Share

नंदुरबार: जिल्ह्यातून रोजगारासाठी होणारे स्थलांतर आणि कुपोषण यांचा संबंध असतो हे पुन्हा सिद्ध झाले आहे. नंदुरबारमधील हजारो कुटुंब रोजगारासाठी गुजरात राज्यात स्थलांतर करत असतात, या कुटुंबासोबत त्यांची लहान मुले जात असतात. स्थलांतरामुळं लहान बालकं अंगणवाडीतून दिल्या जाणाऱ्या पोषण आहारापासून वंचित राहतात. स्थलांतरित मुलांच्या नावाने येणाऱ्या पोषण आहाराचं पुढं काय होतं?, प्रशासन स्थलांतर झालेल्या बालकांची खरी आकडेवारी देते का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Nandurbar forty thousand families migrated to Gujrat but facing trouble of Malnutrition)

नंदुरबारमधून 40 हजार कुटुंबाचं स्थलांतर

नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास 40 हजार कुटुंब रोजगारासाठी स्थलांतर करतात. या कुटुंबासोबत त्यांची लहान मुले ही जात असतात. या मुलांसाठी सरकारच्या विविध योजनांमधून पोषण आहार येत असतो. हा पोषण जातो कुठे? कुपोषणासाठी येणाऱ्या योजनांवर शासकीय अधिकारी डल्ला मारत असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभाग देत असलेली आकडेवारी खोटी आहे, असा आरोप भाजपचे जिल्हा परिषद सदस्य भारत गावित यांनी केला आहे.

जिल्ह्यातून आता पर्यंत 1 हजार 369 बालकांनी स्थलांतर केलं आहे. फक्त 9 गर्भवती मातानी स्थलांतर केल्याची माहिती महिला आणि बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा राठोड यांनी दिली आहे. मात्र, एकीकडे 40 हजारांपेक्षा जास्त परिवाराचे स्थलांतर होत असते. मग, फक्त 1हजार बालकांची संख्या देऊन वेळ मारून नेण्याचा प्रकार आहे का असा सवाल विचारला जात आहे.

आकडेवारीचा खेळ?

कुपोषण निर्मूलनासाठी महिला आणि बालविकास विभागाला कोट्यवधींचा निधी येत असतो. मात्र, आकडेवारीचा खेळ खेळला जातो आणि पोषण आहार असो की अन्य योजना कोण घश्यात घालत आहे. त्याची चौकशी होऊन झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, पालघरमध्ये वाढलेल्या कुपोषणाच्या आकडेवारीत पुन्हा एकदा वाढ झाल्यानं भाजप नेते माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती.  असून महा विकास आघाडी सरकार भाजप ने तयार केलेल्या योजनांची अमंलबजावणी करत नसल्याने कुपोषणात वाढ झाल्याचा आरोप भाजप चे माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला आहे

संबंधित बातम्या:

अण्णांना शांत करण्याचा भाजपचा प्रयत्न तर आघाडीचा भडकवण्याचा? वाचा गृहमंत्री देशमुख काय म्हणतायत?

वाळू तस्करांची हिम्मत वाढली, नायब तहसीलदार-तलाठ्यावर चाकू हल्ला

(Nandurbar forty thousand families migrated to Gujrat but facing trouble of Malnutrition)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.