AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“शिवसेनेवर भुकंण्यासाठी नारायण राणे यांना भाजपचं मंत्रीपद”; ठाकरे गटाच्या नेत्याने राणेंचा राजकीय इतिहास सांगितला

आमदार राजन साळवी यांनी लोकसभा निवडणुकीचे जाहीर आव्हान देत, नारायण राणे यांनी कोकणातून निवडणूक लढवून दाखवावी असा थेट इशाराही त्यांना देण्यात आला आहे.

शिवसेनेवर भुकंण्यासाठी नारायण राणे यांना भाजपचं मंत्रीपद; ठाकरे गटाच्या नेत्याने राणेंचा राजकीय इतिहास सांगितला
| Edited By: | Updated on: Jan 16, 2023 | 5:49 PM
Share

मुंबईः ठाकरे गट आणि नारायण राणे कुटुंबीयांकडून वारंवार ठाकरे घराण्यावर जोरदार हल्लाबोल केला जातो. नुकताच मुख्यमंत्री पदावरूनही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर नारायण राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. तर दुसरीकडे अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणावरनही आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले होते.

त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार राजन साळवे यांनी नारायण राणे यांची लायकी काढत शिवसेनेवर भुंकण्यासाठीच नारायण राणे यांना मंत्रिपद दिले असल्याची जहरी टीका त्यांनी केली आहे. त्यामुळे भविष्यात आता राणे आणि ठाकरे गट आणखी वाद चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार प्रहार करत नारायण राणे यांना शिवसेनेमुळे ते मंत्री, मुख्यमंत्री आणि आता केंद्रीय मंत्री झाले आहेत. मात्र ज्या शिवसेनेने त्यांना मोठे केले आहे, त्या शिवसेनेला ते विसरले असल्याची टीका राजन साळवी यांनी केली आहे.

नारायण राणे सध्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत आहेत. त्यांच्या गंभीर आरोपरही करत आहेत. त्यावर बोलताना राजन साळवी यांनी सांगितले की, नारायण राणे जे आरोप करतात त्यांनी लोकांसमोर आणावे.

कारण केंद्रात आणि राज्यात त्यांची सत्ता आहे. मात्र ते धाडस राणे करत नाहीत कारण त्यांना सध्या पराभूत पराभूत असा अनुभव येत असल्याने त्यांनी त्यांच्याकडून वाटेल ते आरोप केले जात आहेत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

नारायण राणे आज ठाकरे कुटुंबीयांवर आरोप करत असले तरी त्यांच्यामध्ये हिम्मत असेल तर त्यांनी कोकणातून लोकसभा निवडणूक लढवून दाखवावी असे जाहीर आव्हान राजन साळवी यांनी केले आहे. त्यामुळे राणे आणि ठाकरे कुटुंबीय वाद आणखी चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.

आमदार राजन साळवी यांनी लोकसभा निवडणुकीचे जाहीर आव्हान देत, नारायण राणे यांनी कोकणातून निवडणूक लढवून दाखवावी असा थेट इशाराही त्यांना देण्यात आला आहे.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.