नाशिकः नाशिकमध्ये डिसेंबर महिन्यात झालेले भव्य-दिव्य आणि डोळे दिपवून टाकणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उभ्या महाराष्ट्राने पाहिले. या संमेलनाला राज्यभरातून लाखो रसिकांनी हजेरी लावली. शेवटच्या दिवशी तर पाय ठेवायलाही जागा नव्हती. आडगाव मेट परिसरात अक्षरशः किती तरी वेळ वाहतूक कोंडीमुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. या साऱ्या आठवणी ताज्या असताना आता नाशिकमध्ये 14 वे अखिल भारतीय मुस्लिम साहित्य संमेलन होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या संमेलनाला राज्यभरातून रसिक हजेरी लावतील, असा आशावादही आयोजकांनी व्यक्त केला.