AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Election| प्रभागरचना 15 जानेवारीपर्यंत लांबणीवर; महापालिका निवडणूक पुढे ढकलणार?

ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. हा आदेश ग्राह्य धरून निवडणूक आयोगाची तयारी सुरू आहे. याप्रकरणी आता 17 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Nashik Election| प्रभागरचना 15 जानेवारीपर्यंत लांबणीवर; महापालिका निवडणूक पुढे ढकलणार?
Nashik Municipal Corporation.
| Edited By: | Updated on: Jun 17, 2022 | 9:16 PM
Share

नाशिकः प्रचंड प्रमाणात वाढणारे कोरोना रुग्ण आणि राज्य निवडणूक आयोगाची सूचना यामुळे फेब्रुवारी महिन्यात होणारी महापालिका निवडणूक लांबणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिक महापालिकेसाठीच्या प्रभागरचनेबाबतची सांख्यिकी माहिती, विववरणपत्रे राज्य निवडणूक आयोगाने 6 जानेवारीपर्यंत सादर करण्यास सांगितले होते. मात्र, आता पुन्हा त्यात बदल करून 15 जानेवारीला ही माहिती मागवण्यात आली आहे. त्यानंतर पुढील सारी प्रक्रिया होणार आहे. त्यातच ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. हा आदेश ग्राह्य धरून निवडणूक आयोगाची तयारी सुरू होती. त्यावर आता 17 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. हे सारे पाहता, निवडणुका पुढे ढकलल्या जातील का, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अशी झाली रचना

महापालिकेच्या 133 जागांसाठी 3 सदस्यीय पद्धतीने 44 प्रभागांच्या कच्च्या रचनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. नाशिकमध्ये सुरुवातीला म्हणजे 26 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाने एक सदस्यीय प्रभागरचनेसाठी कच्चा आराखड्याचे काम करण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन सदस्यीय प्रभागरचना झाली. त्यानुसार या कामात पुन्हा बदल झाला. आता नगरसेवकांची संख्याही 122 वरून 133 वर नेण्यात आली. त्यामुळे या कामात पुन्हा बदल करावा लागला. पूर्वीच्या नियोजनानुसार साधरणतः 36 हजार लोकसंख्येचा एक प्रभाग होता. मात्र, नगरसेवकांची संख्या वाढल्यानंतर आता एका प्रभागाची लोकसंख्या 33 हजारांच्या घरात असेल. त्यामुळे कच्च्या प्रभारचनेचे काम पुन्हा करावे लागले. प्रभागरचना तयार करताना प्रत्येक प्रभागानुसार निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यात चर्चा झाली. त्यात चतुःसीमा, रस्ते, नदी-नाले याच्या नियमांचे पालन झाले आहे का, हे तपासण्यात आले. नाशिकमधील काही प्रभागांमध्ये ब्लॉक जुळवणीबाबतचे आक्षेप होते. ते सुद्धा ध्यानात घेतले. त्यानंतर प्रभागरचना अंतिम करण्यात आली. आता राज्य निवडणूक आयोग 15 जानेवारी रोजी या प्रभागरचनेला अंतिम रूप देणार आहे.

आयुक्तांकडे तक्रार

दुसरीकडे महापालिकेची प्रभागरचना फुटल्याचा दावा होत आहे. महापालिकेतील काही मातब्बर नगरसेवकांनी त्यासाठी खेळी केली असून, आपल्या सोयीनुसार वार्डांची रचना केली आहे आणि आपल्याला अडथळे ठरणाऱ्या स्वकीयांचे पत्ते कट करून त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे ही सारी चर्चा नगरसेवकांत सुरू आहे. सध्याच्या प्रभाग क्रमांक 11 मधील कामगारनगर हा परिसर महात्मानगरला जोडण्यात आल्याचे समजते. असे प्रकार इतर ठिकाणीही झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये संताप आहे. याप्रकरणी सातपूर येथील विभाग संघटक प्रशांत दैतकार-पाटील यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना पत्र दिले आहे. सोबतच न्यायालायत जाण्याचा इशारा दिला आहे.

इतर बातम्याः

Panchayat Election|नाशिकमध्ये 4 नगरपंचायतींच्या 11 जागांसाठी 38 उमेदवार रिंगणात

Nashik Corona|नाशिकरांसाठी पुढचे 5 दिवस धोक्याचे…राज्याच्या आरोग्य सचिवांचा काय आहे इशारा?

Nashik| लासलगावसह 16 गावांचा पाणीप्रश्न मार्गी; भुजबळांच्या प्रयत्नातून 17 कोटी 54 लाखांचा निधी मंजूर

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.