AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बँक अडचणीत असताना मॅनेजरसाठी गावकरी एकवटले, मॅनेजरची बदली रद्द करण्यासाठी पाहा काय केलं?

जिल्हा बँकेच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने होत असतांना कर्ज वसूली करून सुद्धा शेतकऱ्यांनी मॅनेजरच्या बदली रद्दकरण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.

बँक अडचणीत असताना मॅनेजरसाठी गावकरी एकवटले, मॅनेजरची बदली रद्द करण्यासाठी पाहा काय केलं?
Image Credit source: TV9 Network
| Edited By: Kiran Balasaheb Tajne | Updated on: Apr 19, 2023 | 4:41 PM
Share

येवला, नाशिक : सक्तीच्या कर्ज वसुलीमुळे शेतकऱ्यांच्या निशाणावर असलेली नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सध्या चर्चेचा विषय बनली आहे. असे असताना मॅनेजरची बदली रद्द करावी यासाठी येवला तालुक्यातील सायगाव येथील गावकरी एकवटले आहे. बँकेच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकून गावकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केल्याची घटना समोर आली आहे. खरंतर ज्या मॅनेजर शेतकाऱ्यांकडून कर्ज वसूलीची कामगिरी केली त्याची बदली करून बँकेच्या प्रशासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिक जिल्हा बँक सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय असतांना एखाद्या कर्मचाऱ्यासाठी ते शेतकरी आक्रमक होण्याची ही पहिलीच वेळ असावी.

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील सायगाव येथे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. या शाखेत सायगाव, पांजरवाडी, नारखेडे आणि अंगुलगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे खाते आहे.

सायगावच्या शाखेचे मॅनेजर संजय नागपुरे यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेत कर्ज वसुली सुद्धा चांगली केली आहे. नव्याने कर्ज वाटप चालू केले असताना त्यात मॅनेजर संजय नागपुरे यांची अचानक बदली करण्यात आली.

विशेष म्हणजे संजय नगपुरे यांची बदली झालेली असतांना त्या पदावर नवीन नियुक्ती न केल्याने पैसे मिळण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण येत आहे. तसेच कांद्याचे सानुग्रह अनुदान अर्ज करण्याची मुदतही उद्या संपणार आहे.

दरम्यान अनुदानाच्या अर्जाच्या संदर्भात मुदत संपत आल्याने अनुदानाची रक्कम खात्यांमध्ये लवकर वर्ग होईल अशी स्थिती आहे. ती रक्कम मिळवण्यासाठी अडचणी निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत आहे.

संतप्त सोसायटीचे संचालक आणि शेतकऱ्यांनी एकत्र येत मॅनेजर संजय नागपुरे यांची बदली रद्द करावी यासाठी प्रवेशद्वाराच्या गेटलाच टाळे ठोकले आहे. जोपर्यंत बदली रद्द होत नाही तोपर्यंत टाळे ठोको आंदोलन मागे न घेण्याची भूमिका घेतली आहे.

सायगाव येथील शेतकऱ्यांनी आणि काही सोसायटीच्या संचालकांनी घेतलेल्या या आक्रमक आंदोलनामुळे बँकेचे दैनदिन कामकाज करण्यासाठीचा पेच निर्माण झाला आहे. बँकेच्या मॅनेजर करिता शेतकरी आक्रमक झाल्याचे हे प्रकरण पहिल्यांदाच घडल्याचे बोलले जात आहे.

संपूर्ण नाशिक जिल्ह्यात सायगव येथील शेतकऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेची चर्चा होत आहे. एखादा मॅनेजर वसूली करीत असतांना विरोध न करता त्याला प्रतिसाद देणे आणि त्याच्या बदलीनंतर बदली रद्द करिता आक्रमक झाल्याने जोरदार चर्चा होत आहे.

Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.