AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाजार समितीत कांदा घेऊन चालला होता, मात्र वाटेतच काळाने घाला घातला !

कांदा विक्रीसाठी ट्रॅक्टर घेऊन बाजार समितीत शेतकरी चालला होता. मात्र बाजार समितीत पोहचण्याआधीच शेतकऱ्यावर काळाने घाला घातला.

बाजार समितीत कांदा घेऊन चालला होता, मात्र वाटेतच काळाने घाला घातला !
मालेगावमध्ये पिकअप वाहनाची ट्रॅक्टरला धडकImage Credit source: TV9
| Updated on: Mar 29, 2023 | 12:35 PM
Share

मालेगाव / मनोहर शेवाळे : कांदा विक्रीसाठी बाजार समितीत घेऊन जाणाऱ्या एका शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरला पिक-अप वाहनाने धडक दिल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावरील जळगाव खुर्द गावाजवळ मध्यरात्री ही घटना घडली. एकनाथ सोनावणे असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात पीकअप चालकाविरोधात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

कांदा घेऊन बाजारात समितीत चालले होते

सोनावणे हे हिंगणे-देहरे येथून नांदगाव बाजार समितीत कांदा विक्रीसाठी घेऊन चालले होते. कांदा विकला जावा यासाठी शेतकरी रात्रीच बाजार समितीत नंबर लावण्यासाठी जात असतात. कांदा विकून पैसे मिळावे यासाठी शेतकऱ्यांची सध्या धडपड सुरू असते. बाजार समितीत जात असतानाच चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावर अज्ञात पिकअप वाहनाने ट्रॅक्टरला धडक दिली.

अज्ञात पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल

या धडकेत सोनावणे हे जागीच ठार झाले. जळगाव खुर्द येथे चाळीसगावकडून येणाऱ्या मालवाहू पिकअपने ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. याप्रकरणी अज्ञात पिकअप चालकाविरोधात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

शेतमजूर असलेल्या क्रुझर गाडीचा लासलगावजवळ अपघात

पुणे जिल्ह्यातील चाकण, नारायणगाव परिसरामध्ये सध्या उन्हाळी कांदा काढण्याचे काम सुरु झाले आहे. कांदा काढणीच्या कामासाठी मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा येथून चार क्रुझर गाड्यांमध्ये शेत मजूर हे लासलगाव मार्गे नारायणगाव येथे चालले होते. एका क्रूजर गाडी समोर अचानक सायकलस्वार आल्याने सायकलस्वारला वाचवायच्या नादात क्रुझर गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यांमध्ये पलटी झाली. या अपघातात 10 जण जखमी झाले. यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.