AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“गद्दारांच्या मनात 32 वर्षाच्या युवकानं धडकी भरवली”; ठाकरे गटाने एल्गार पुकारला…

ज्या आदित्य ठाकरे यांनी पायाला भिंगरी लावून महाराष्ट्राचा दौरा केला आहे. अशा तरुण नेतृत्वाच्या मागे उभं राहण्याची सध्या गरज आहे.

गद्दारांच्या मनात 32 वर्षाच्या युवकानं धडकी भरवली; ठाकरे गटाने एल्गार पुकारला...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Feb 06, 2023 | 9:39 PM
Share

नाशिकः राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या आणि पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवडची पोटनिवडणूक लागल्यापासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून विविध भागात राजकीय दौऱ्यावर आहेत. त्याच दौऱ्याबद्दल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आदित्य ठाकरे यांचे कौतूक करत आदित्य ठाकरे जर 50 गावांचा विकास दौरा करत असतील तर आपण 5 जागी तर गेलं पाहिजे असं आवाहन अंबादास दानवे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी बोलताना सांगितले की, ज्या दिवसांपासून राज्यात बंडखोरी करून ज्यांनी सत्तांतर घडवले आहे. त्यांच्याच छातीत आता 32 वर्षाच्या युवकानं धडकी भरवली आहे.

कारण मागच्या चार महिन्यापासून आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र पालथा घातला आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर ज्या गद्दार आमदारांनी गद्दारी केली आहे, त्यांच्या मनात आता भीती भरली असल्याचेही त्यांनी सांगितले.

ज्या आदित्य ठाकरे यांनी पायाला भिंगरी लावून महाराष्ट्राचा दौरा केला आहे. अशा तरुण नेतृत्वाच्या मागे उभं राहण्याची सध्या गरज आहे.

कारण येणाऱ्या काळातच आदित्य ठाकरे यांच्यासारख्या तरुण नेतृत्वाकडे आपण संधी पाहिजे. कारण आदित्य ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून 50 गावी जात असतील तर आपण 5 जागी तर गेलं पाहिजे, गावा गावातील लोकांना भेटले पाहिजे, तरच आगामी निवडणुकीतून भगवा फडकवला जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितले.

सध्या राज्यातील राजकारण प्रचंड बदलले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी ज्या प्रकारे दौरे सुरु केले आहेत. त्याच प्रमाणे राजकीय कार्यकर्त्यांनीही आपल्या भागाचे दौरे काढले पाहिजेत.

आपापल्या परिसरातील लोकांना भेटले पाहिजे. कारण सध्या राज्यात खोके सरकार आल्याने राजकीय परिस्थिती बदलली आहे.

त्यामुळे आपण गनिमी काव्यानं लढण्याची गरज आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले. गावा गावातून दौरे काढून, लोकांना भेटून आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी वॉर्ड, बुथवर काम करायला पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी अंबादास दानवे यांनी सांगितले की, मी संभाजीनगरचा आहे तर 1988 पासून पालिका ताब्यात आहे, जर महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात असती तर आपणदेखील परिवर्तन केलं असतं असा विश्वासही अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.

Follow Us
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!