AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“कृषी मंत्री सत्तार येणार,पण ते आम्हाला काय देणार”; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पोटतिडकीने केला सवाल…

आमच्या नुकसानीची पाहणी करायला कृषी मंत्री सत्तार येणार आहेत. पण ते आम्हाला काय देणार आहे. आमच्या नुकसान झालेल्या कांद्यावर आता रोटरी मारण्याची वेळ आलेली आहे.

कृषी मंत्री सत्तार येणार,पण ते आम्हाला काय देणार; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पोटतिडकीने केला सवाल...
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Mar 21, 2023 | 6:48 PM
Share

निफाड/ नाशिक : राज्यात झालेल्या अवकाळी आणि झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिकं वाया गेल्याने आता आम्ही जगायचं कसं असा सवाल शेतकरी करू लागले आहेत. ऐन रब्बी हंगामामध्ये अवकाळी पावसाने धूमाकूळ घातल्यामुळे आणि दुसरीकडे शेतमालाला योग्य बाजारभाव मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यांनी उभा पिकावर नांगर फिरवला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने आता जगायचं कसा असा सवाल शेतकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे.

राज्यात सत्तांतर झाले त्यावेळी आमदार शहाजी बापू पाटील यांचे मोबाईलवरील संवाद व्हायरल झाले होते. त्यावेळेपासून आमदार शहाजी बापू पाटील प्रचंड चर्चेत आले आहेत. आता त्यांचा मोबाईलवरील डायलॉग चर्चेत आला आहे तो मात्र शेतकऱ्यांच्या आर्त स्वराने.

यावेळी आमदार शहाजी बापू पाटील यांच्याच स्वरात स्वर मिसळून एका शेतकऱ्याने आमदार पाटील यांना सवाल उपस्थित केला आहे.

गुवाहाटीला जाऊन काय झाडी, काय डोंगर म्हणणारे शहाजी बापू पाटील यांनी आता गारपीट झाल्यानंतर शेतकऱ्यांची काय अवस्था आहे ते इथे येऊन पाहावं. काय द्राक्ष बागा, काय कांद्याच्या पाती, आमचं समदं कसं निसर्गानं ओके केलं आहे, हे येऊन पाहावं अशा आर्त स्वरात शेतकऱ्यांनी त्यांना सवाल उपस्थित केला आहे.

निफाड तालुक्यातील कुंभारी येथील गारपिटीमुळे नुकसान झालेल्या कांदा उत्पादक रमेश नामदेव शेजवळ यांनी शहाजी पाटील यांना आपली व्यथा सांगितली आहे.

आमच्या नुकसानीची पाहणी करायला कृषी मंत्री सत्तार येणार आहेत. पण ते आम्हाला काय देणार आहे. आमच्या नुकसान झालेल्या कांद्यावर आता रोटरी मारण्याची वेळ आलेली आहे.

हीच अवस्था सगळ्या शेतकऱ्यांची झाली असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. लाल कांद्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर कुंभारी येथील रमेश शेजवळ यांनी उन्हाळ कांद्याची 1 एकर लागवड केली होती.

शनिवारी झालेल्या गारपिटीने कांदा पात पूर्णतः आडवी झाल्याने या कांदा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

यावेळी आपली भावना व्यक्त करताना त्यांनी शहाजी बापू पाटील यांच्याकडे बोट करून आमच्या व्यथा जाणून घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...