AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kolhapur North By Poll Election 2022 : त्यांचे भोंगे उतरवण्याचं काम कोल्हापूरकरांनी केलं, संजय राऊत म्हणतात, हे तर महाराष्ट्राचं जनमत!

खासदार संजय राऊत म्हणाले की, कोल्हापूरच्या जनतेने त्यांचे भोंगे खाली उतरवले आहेत. त्यामुळे आता हिमालयात कोण जाते ते पाहुयात. विले-पार्लेच्या पोटनिवडणुकीत बाळासाहेबांनी पहिल्यांदा हिंदुत्वाची सुरुवात केली. भोंगे लावून हिंदुत्व वाढत नाही. भोंग्यामागचे आवाज कोणाचे हे साऱ्यांना माहित आहे.

Kolhapur North By Poll Election 2022 : त्यांचे भोंगे उतरवण्याचं काम कोल्हापूरकरांनी केलं, संजय राऊत म्हणतात, हे तर महाराष्ट्राचं जनमत!
Sanjay rautImage Credit source: TV9
| Updated on: Apr 16, 2022 | 1:57 PM
Share

नाशिकः काही लोक हनुमान चालिसा म्हणायला पुण्याला पोहचले आहेत. मात्र, भाड्याने हिंदुत्व घेतलेल्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. कोल्हापुरात (Kolhapur) प्रचार शिगेला पोहोचला असतानाच काहींनी भोंगे, हनुमान चालिसा असे घाणेरडे राजकारण सुरू करून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे भोंगे उतरवण्याचे काम कोल्हापूरकरांनी केले आहे. हेच महाराष्ट्राचे जनमत आहे, असा दावा शनिवारी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाशिकमध्ये (Nashik) करत कोल्हापूरच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. कोल्हापूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव विरुद्ध भाजपचे सत्यजीत कदम अशी लढत झाली. निवडणुकीत मतमोजणीच्या एकूण 26 फेऱ्या पार पडल्या. यात सुरुवातीपासूनच जयश्री जाधव या आघाडीवर होत्या. शेवटच्या 26 व्या फेरीपर्यंत एकूण 18901 मतांनी जयश्री जाधव विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. जाधव आघाडीवर असतानाच नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत राऊतांनी आनंद साजरा केला.

काय म्हणाले राऊत?

खासदार संजय राऊत म्हणाले की, कोल्हापूरच्या जनतेने त्यांचे भोंगे खाली उतरवले आहेत. त्यामुळे आता हिमालयात कोण जाते ते पाहुयात. विले-पार्लेच्या पोटनिवडणुकीत बाळासाहेबांनी पहिल्यांदा हिंदुत्वाची सुरुवात केली. भोंगे लावून हिंदुत्व वाढत नाही. भोंग्यामागचे आवाज कोणाचे हे साऱ्यांना माहित आहे. भोंग्याचे राजकारण आजच संपलेले आहे, असा दावा त्यांनी केला.

दंगली घडवण्याचा प्रयत्न

संजय राऊत म्हणाले की, रामनवमीला 10 राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न होता. ज्या ठिकाणी निवडणूक तिथे दंगली घडवायच्या होत्या. हिजाबचा मुद्दा उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर संपला. पण महाराष्ट्रात सत्ता येत नाही म्हणून भाजप निराशेने ग्रासला आहे. त्यांचे इथे नव हिंदू ओवेसेमार्फत दंगली घडवण्याचे कारस्थान आहे. त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करून राष्ट्रपती राजवट लावण्याचा डाव आहे, असा आरोपही त्यांनी केला.

दोन कडवीही पाठ नाहीत…

संजय राऊत म्हणाले की, हनुमान चालीसाची पहिली दोन कडवी देखील त्यांना पाठ नसतील. त्या तथाकथित हनुमान भक्तांनी कॅमेऱ्यासमोर येऊन हनुमान चालीसा म्हणावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी हनुमान चालीसा म्हणत असल्याचे सांगत स्त्रोत म्हटले. पत्रकारांनी ही चालीसा नसून, स्तोत्र असल्याचे सांगताच त्यांची गडबड झालेली दिसली.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...